म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ व भाजीपाल्यावरील नियंत्रण उठवल्याने ग्रामीण भागात खाजगी व्यापारी व पोटव्यापाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची लूट व फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यात बहुसंख्येने अद्रक उत्पादक शेतकरी आहेत.
कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अद्रक उत्पादन होते. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अद्रक व्यापारी व पोट व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. पैसे कसे मिळतील यासाठी अद्रक विकलेल्या शेतकऱ्यांचा आटापिटा चालू आहे. तालुक्यातील कन्नड, बहीरगाव, हतनूर, कोळवाडी, कळंकी, अंधानेर भागात अद्रक खरेदीदार, खासगी पोटव्यापाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दरामध्ये स्पर्धा वाढल्याने नगदीसाठी वेगळे व उधारीवर वेगळे दर मिळत होते. गेल्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अद्रक विकली. परंतु, त्यापैकी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना पैशासाठी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. व्यवहारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सांगून काही व्यापारी संपत्ती विकून पैसे देत आहेत. परंतु, अनेक व्यापारी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील एक हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हे पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे.
ठोक व्यापाऱ्यांकडून फसवणूक
दुसरीकडे ठोक व्यापाऱ्यांकडून भावाच्या बाबतीत मोठी अडवणूक झाल्याचे किरकोळ व्यापारी सांगत आहेत. खरेदीच्या वेळी एक भाव आणि ट्रक पाठवल्यानंतर वेगळा भाव यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत तक्रार करावी तर कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकेकाळी भरभराटीचे दिवस पाहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
माझ्या दोन हेक्टरवरील एक लाख ९७ हजार रुपयांची अद्रक डिसेंबर महिन्यात नगदीच्या बोलीवर बहीरगाव येथील व्यापाऱ्यास दिली. त्याने मला चेक दिला. परंतु, तो दोन वेळेस बाउन्स झाला. परंतु दोनदा माझा चेक बाउन्स झाला आहे.
-आप्पाराव मगर, शेतकरी हतनूर
शेतकरी कन्नड येथील बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये अद्रक विकू शकतो. यामुळे संभाव्य फसवणूक टाळता येते. खासगी व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत नसतील, तर त्यांनी कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करावी. शेतमाल विकताना काळजी घ्यावी.
-राजेंद्र मगर, सभापती, बाजार समिती
शेतकऱ्यांनी अद्रक व भाजीपाला विकताना व्यापाऱ्याविषयी माहिती घेवूनच नगदीने माल विकावा. फसवणुकीचे प्रकार वाढल्याने माल विकताना काळजी घ्यावी.
- किशोर सोनवणे, शेतकरी बहीरगाव
कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ व भाजीपाल्यावरील नियंत्रण उठवल्याने ग्रामीण भागात खाजगी व्यापारी व पोटव्यापाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची लूट व फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यात बहुसंख्येने अद्रक उत्पादक शेतकरी आहेत.
कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अद्रक उत्पादन होते. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अद्रक व्यापारी व पोट व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. पैसे कसे मिळतील यासाठी अद्रक विकलेल्या शेतकऱ्यांचा आटापिटा चालू आहे. तालुक्यातील कन्नड, बहीरगाव, हतनूर, कोळवाडी, कळंकी, अंधानेर भागात अद्रक खरेदीदार, खासगी पोटव्यापाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दरामध्ये स्पर्धा वाढल्याने नगदीसाठी वेगळे व उधारीवर वेगळे दर मिळत होते. गेल्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अद्रक विकली. परंतु, त्यापैकी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना पैशासाठी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. व्यवहारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सांगून काही व्यापारी संपत्ती विकून पैसे देत आहेत. परंतु, अनेक व्यापारी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील एक हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हे पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे.
ठोक व्यापाऱ्यांकडून फसवणूक
दुसरीकडे ठोक व्यापाऱ्यांकडून भावाच्या बाबतीत मोठी अडवणूक झाल्याचे किरकोळ व्यापारी सांगत आहेत. खरेदीच्या वेळी एक भाव आणि ट्रक पाठवल्यानंतर वेगळा भाव यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत तक्रार करावी तर कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकेकाळी भरभराटीचे दिवस पाहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
माझ्या दोन हेक्टरवरील एक लाख ९७ हजार रुपयांची अद्रक डिसेंबर महिन्यात नगदीच्या बोलीवर बहीरगाव येथील व्यापाऱ्यास दिली. त्याने मला चेक दिला. परंतु, तो दोन वेळेस बाउन्स झाला. परंतु दोनदा माझा चेक बाउन्स झाला आहे.
-आप्पाराव मगर, शेतकरी हतनूर
शेतकरी कन्नड येथील बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये अद्रक विकू शकतो. यामुळे संभाव्य फसवणूक टाळता येते. खासगी व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत नसतील, तर त्यांनी कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करावी. शेतमाल विकताना काळजी घ्यावी.
-राजेंद्र मगर, सभापती, बाजार समिती
शेतकऱ्यांनी अद्रक व भाजीपाला विकताना व्यापाऱ्याविषयी माहिती घेवूनच नगदीने माल विकावा. फसवणुकीचे प्रकार वाढल्याने माल विकताना काळजी घ्यावी.
- किशोर सोनवणे, शेतकरी बहीरगाव