म. टा, प्रतिनिधी, फर्दापूर
फर्दापूर येथे पाणी पुरवण्यासाठी तीन खासगी टँकर आले आहेत. पण, त्यांना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळामार्फत पाणी मिळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही फर्दापूरकरांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
फर्दापूर येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकरचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता देऊन तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. या टँकरना अजिंठा विकास योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहेत. पण, पाणी मिळत नसल्याने तीनही टँकर फर्दापूरमध्ये उभे आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य विलास वराडे यांनी पर्यटन विकास महामंडळाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावर्षी फर्दापूरकरिता मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाच कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. पण, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे २० वर्षांपासून गावकऱ्यांना खासगी टँकर व बोअरधारकांकडून पाणी विकत घ्यावे लागते. या भागातील पाऊस वाघूर नदीतून खान्देशात वाहून जाते. ही नदी एप्रिल, मे व जून महिन्यात कोरडी पडते.
आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेतो. त्यामुळे फर्दापूरसाठी त्यांच्याकडूनच पाणी घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आमची काही हरकत नाही. सध्या लेणीत पर्यटकांची गर्दी नसल्याने आम्हाला जास्त पाण्याची गरज नाही. त्यामुळे आधी गावकऱयांना पाणी द्यावे.
-अण्णासाहेब शिंदे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी
फर्दापूर येथे पाणी पुरवण्यासाठी तीन खासगी टँकर आले आहेत. पण, त्यांना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळामार्फत पाणी मिळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही फर्दापूरकरांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
फर्दापूर येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकरचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मान्यता देऊन तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. या टँकरना अजिंठा विकास योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहेत. पण, पाणी मिळत नसल्याने तीनही टँकर फर्दापूरमध्ये उभे आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य विलास वराडे यांनी पर्यटन विकास महामंडळाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावर्षी फर्दापूरकरिता मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाच कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. पण, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे २० वर्षांपासून गावकऱ्यांना खासगी टँकर व बोअरधारकांकडून पाणी विकत घ्यावे लागते. या भागातील पाऊस वाघूर नदीतून खान्देशात वाहून जाते. ही नदी एप्रिल, मे व जून महिन्यात कोरडी पडते.
आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेतो. त्यामुळे फर्दापूरसाठी त्यांच्याकडूनच पाणी घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आमची काही हरकत नाही. सध्या लेणीत पर्यटकांची गर्दी नसल्याने आम्हाला जास्त पाण्याची गरज नाही. त्यामुळे आधी गावकऱयांना पाणी द्यावे.
-अण्णासाहेब शिंदे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी