म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील ३७ गावांपैकी गोळेगाव आणि खिर्डी या दोन गावांत चुरस निर्माण झाली आहे. ‘माथा ते पायथा’ कामामुळे मान्सूनपूर्व पावसाने खिर्डी परिसर जलमय झाला आहे. खिर्डी शिवारातील डोंगरावर एनएमके-१ सीताफळाच्या नऊ हजार झाडांची लागवड करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
खिर्डी परिसरात डोंगर रांग असून ते उन्हाळ्यात उजाड दिसतात. यंदा चांगला पाऊस झाला व वॉटर कप स्पर्धेतून केलेल्या कामामुळे डोंगरांवर पाणी साचलेले दिसत आहे. पडिक जमिनीवर यंदा मोठ्या प्रमाणात सीताफळ लागवड केले जाणार आहेत. डोंगर रांगांनी वेढलेल्या खुलताबाद तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सीताफळ उपलब्ध होतात. या फळाला मशागत करायची गरज नाही, पाणी घालण्याची गरज नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर येणारे हे फळ आहे. सीताफळाचा हंगाम किमान एक महिना चालतो. सीताफळ हे प्रामुख्याने माळरान व पडिक जमिनीवर पीक आहे. सध्याची बहुतांश झाडे नैसर्गिकपणे उगवलेली आहेत.
कधीकाळी डोंगरमाथ्यावर बेवारस अवस्थेत वाढणाऱ्या या फळपिकाचे व्यवस्थापन आता खिर्डी येथील ग्रामस्थ करणार आहेत. सेवानिवृत्त कृषी अधिकारी देविदास कुलकर्णी यांनी स्वतः श्रमदान करून तांत्रिक मार्गदर्शन केले. कुलकर्णी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी यंत्रासाठी लागणाऱ्या डिझेल खर्चासाठी वैयक्तिक पाच हजार रुपयांची मदत देखील दिली आहे. कृष्णा चव्हाण, सुभाष धोत्रे, विजय वरकड यांच्यासह खिर्डी येथील ग्रामस्थ सीताफळाच्या माध्यमातून गावची नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
एनएमके-१
संत्री, मोसंबी, चिकू, पेरू, आंबा या फळांप्रमाणे सीताफळाची लागवड कमी आढळते. या पिकात बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावच्या नवनाथ कसपटे यांनी मोठी मजल मारली आहे. त्यांनी एनएमके-१ हे सीताफळाचे वाण विकसित केले. त्यांचे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या वाणात बिया कमी आहेत. सीताफळात पन्नास टक्के गर आहे. दुसऱ्या सीताफळात तो तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत आढळतो. या सीताफळाचे रोप ७० रुपयाला एक याप्रमाणे उपलब्ध आहे.
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील ३७ गावांपैकी गोळेगाव आणि खिर्डी या दोन गावांत चुरस निर्माण झाली आहे. ‘माथा ते पायथा’ कामामुळे मान्सूनपूर्व पावसाने खिर्डी परिसर जलमय झाला आहे. खिर्डी शिवारातील डोंगरावर एनएमके-१ सीताफळाच्या नऊ हजार झाडांची लागवड करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
खिर्डी परिसरात डोंगर रांग असून ते उन्हाळ्यात उजाड दिसतात. यंदा चांगला पाऊस झाला व वॉटर कप स्पर्धेतून केलेल्या कामामुळे डोंगरांवर पाणी साचलेले दिसत आहे. पडिक जमिनीवर यंदा मोठ्या प्रमाणात सीताफळ लागवड केले जाणार आहेत. डोंगर रांगांनी वेढलेल्या खुलताबाद तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सीताफळ उपलब्ध होतात. या फळाला मशागत करायची गरज नाही, पाणी घालण्याची गरज नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर येणारे हे फळ आहे. सीताफळाचा हंगाम किमान एक महिना चालतो. सीताफळ हे प्रामुख्याने माळरान व पडिक जमिनीवर पीक आहे. सध्याची बहुतांश झाडे नैसर्गिकपणे उगवलेली आहेत.
कधीकाळी डोंगरमाथ्यावर बेवारस अवस्थेत वाढणाऱ्या या फळपिकाचे व्यवस्थापन आता खिर्डी येथील ग्रामस्थ करणार आहेत. सेवानिवृत्त कृषी अधिकारी देविदास कुलकर्णी यांनी स्वतः श्रमदान करून तांत्रिक मार्गदर्शन केले. कुलकर्णी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी यंत्रासाठी लागणाऱ्या डिझेल खर्चासाठी वैयक्तिक पाच हजार रुपयांची मदत देखील दिली आहे. कृष्णा चव्हाण, सुभाष धोत्रे, विजय वरकड यांच्यासह खिर्डी येथील ग्रामस्थ सीताफळाच्या माध्यमातून गावची नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
एनएमके-१
संत्री, मोसंबी, चिकू, पेरू, आंबा या फळांप्रमाणे सीताफळाची लागवड कमी आढळते. या पिकात बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावच्या नवनाथ कसपटे यांनी मोठी मजल मारली आहे. त्यांनी एनएमके-१ हे सीताफळाचे वाण विकसित केले. त्यांचे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या वाणात बिया कमी आहेत. सीताफळात पन्नास टक्के गर आहे. दुसऱ्या सीताफळात तो तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत आढळतो. या सीताफळाचे रोप ७० रुपयाला एक याप्रमाणे उपलब्ध आहे.