म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
जलसंवर्धनासाठी तालुक्यातील ३७ गावांत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेचा समारोप झाला असला तरीही सर्वांचे लक्ष निकालाकडे लक्ष लागले आहे. मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने श्रमदानातून गोळेगावात कामांची पाहणी केली.
पाणलोटक्षेत्रात तलावातील गाळ काढणे, चर खोदणे, शोषखड्डे, विहिरी, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, नाला, नदी खोलीकरण आदी कामे गोळेगावात करण्यात आली आहेत. यामुळे पावसानंतर २८ कोटी ९६ लाख लिटर पाणीसाठा निर्माण होईल, असा अंदाज आहे. या स्पर्धेने गोळेगावचे रूपडे पालटले आहे. त्याची सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ३७ गावांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी दहा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. गोळेगाव, खिर्डी येथे चांगला प्रयत्न झाला आहे. या स्पर्धेचा निकष श्रमदानातून कामे करणे हा होता. गोळेगावात श्रमदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार अरूण जऱ्हाड, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, मंडळ कृषी अधिकारी अशोक अहिरे, विशाल आगलावे, कृषी पर्यवेक्षक मिलिंद कोलंबीकर, कृषी सहायक अशोक पठाडे यांनी स्वतः हातात फावडे घेऊन श्रमदान केल्याने कामाला गती आली. श्रमदानासह यंत्राद्वारेही कामे झाली. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली होती.
वॉटर कपस्पर्धेसाठी ग्रामस्थांसह सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणेचे सहकार्य लाभले. गाव पाणीदार करण्याची आम्हाला संधी मिळाली. स्पर्धेतून सुरू झालेली ही जलसंवर्धन चळवळ निरंतर राहील. दुष्काळमुक्त गावाचे गोळेगाव मॉडेल तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-संतोष जोशी, सरपंच
जलसंवर्धनासाठी तालुक्यातील ३७ गावांत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेचा समारोप झाला असला तरीही सर्वांचे लक्ष निकालाकडे लक्ष लागले आहे. मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने श्रमदानातून गोळेगावात कामांची पाहणी केली.
पाणलोटक्षेत्रात तलावातील गाळ काढणे, चर खोदणे, शोषखड्डे, विहिरी, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, नाला, नदी खोलीकरण आदी कामे गोळेगावात करण्यात आली आहेत. यामुळे पावसानंतर २८ कोटी ९६ लाख लिटर पाणीसाठा निर्माण होईल, असा अंदाज आहे. या स्पर्धेने गोळेगावचे रूपडे पालटले आहे. त्याची सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ३७ गावांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी दहा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. गोळेगाव, खिर्डी येथे चांगला प्रयत्न झाला आहे. या स्पर्धेचा निकष श्रमदानातून कामे करणे हा होता. गोळेगावात श्रमदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार अरूण जऱ्हाड, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, मंडळ कृषी अधिकारी अशोक अहिरे, विशाल आगलावे, कृषी पर्यवेक्षक मिलिंद कोलंबीकर, कृषी सहायक अशोक पठाडे यांनी स्वतः हातात फावडे घेऊन श्रमदान केल्याने कामाला गती आली. श्रमदानासह यंत्राद्वारेही कामे झाली. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली होती.
वॉटर कपस्पर्धेसाठी ग्रामस्थांसह सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणेचे सहकार्य लाभले. गाव पाणीदार करण्याची आम्हाला संधी मिळाली. स्पर्धेतून सुरू झालेली ही जलसंवर्धन चळवळ निरंतर राहील. दुष्काळमुक्त गावाचे गोळेगाव मॉडेल तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-संतोष जोशी, सरपंच