अ‍ॅपशहर

थकबाकीदार कोणीही असो कारवाई कराच

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे थकबाकीदार कोणीही असो त्याचे वीज कनेक्शन कापा, असे आदेश महावितरणचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतरे यांनी दिला आहे.

Maharashtra Times 21 Feb 2018, 12:27 pm
औरंगाबाद: औरंगाबाद व जालना जिल्ह्यात थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे थकबाकीदार कोणीही असो त्याचे वीज कनेक्शन कापा, असे आदेश महावितरणचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतरे यांनी दिला आहे. थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सक्त कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anybody will take any action against the arrears
थकबाकीदार कोणीही असो कारवाई कराच


बिल वसुलीसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद परिमंडळात घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांडे १९४ कोटी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज ग्राहकांकडे ६२ कोटी, पथदिव्यांच्या वीज ग्राहकांकडे २६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. गरज पडल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई करावी अशा सूचना जलतरे यांनी दिल्या आहेत. या बैठकीला मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, रतन सोनुले, कैलास हुमणे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा यांच्यासह कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, इतर अधिकारी उपस्थित होते. वीज ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून डॅशबोर्ड तंत्रज्ञान विकासित करण्यात आले आहे. त्यावर कर्मचाऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अद्ययावत माहिती मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज