म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘देशातील सध्याची राजकीय परिस्थिती क्षणोक्षणी हिटलरशाहीची आठवण करून देणारी आहे. गोहत्या, राममंदिर, तलाक असे प्रश्न निर्माण करण्यामागची भूमिका समाजाने लक्षात घेण्याची वेळ आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि समाजवादी नेते भाई वैद्य यांनी बुधवारी (२६ जुलै) केले. ते मंथन विचारपीठातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होते.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात हा कार्यक्रम झाला. भाई वैद्य यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. त्यानिमित्ताने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देशभरातील सद्यस्थितीवर त्यांनी उपस्थितांशी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रताप बोराडे होते. व्यासपीठावर सुभाष लोमटे, ज्ञानप्रकाश मोदाणी यांची उपस्थित होती. भाई वैद्य म्हणाले, ‘देशापुढे जागतिकीकरण व जमातवाद ही मोठी आव्हाने आहेत. केंद्रातील सरकारला धर्माधिष्ठीत राष्ट्र निर्माण करावयाचे असल्याने त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहेत. केंद्रातील सरकार मोदी किंवा भाजपचे नाही, तर संघांचे आहे. धार्मिक भूमिका प्रभावी करून हिंदू विचार वाढविण्यावर त्यांचा भर आहे. दुसऱ्या समाजाला दुय्यम वागणूक देत त्यांना शत्रू समजायचे असा त्यांचा विचार असून खोटे बोलण्यात संघाचा हात कोणी धरू शकत नाही. जागतिकीकरणामुळे बेरोजगारी, विषमता वाढली. शिक्षण, आरोग्यासारख्या गरजांकडे दुर्लक्ष होते आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रताप बोराडे, डॉ. भालचंद्र कानगो, रमेश खंडागळे, शेख इकबाल मिन्ने, प्रा. विजय दिवाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष लोमटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
वित्तीय भांडवलशाहीचे युग
‘पूर्वीच्या काळात उद्योग क्षेत्रामुळे रोजगार मिळायचा. आज मात्र कामगारांना रोजगाराऐवजी संधी कमी करणारे उद्योगधोरण ठरत आहे. आधुनिकता आणण्याच्या नावाखाली हे केले जात आहे. उत्पादन वाढत असताना कामगार कमी करण्यावर उद्योगांचा प्रयत्न असतो. हे वित्तीय भांडवलशाहीच युग आहे,’ असे भाई वैद्य म्हणाले.
‘देशातील सध्याची राजकीय परिस्थिती क्षणोक्षणी हिटलरशाहीची आठवण करून देणारी आहे. गोहत्या, राममंदिर, तलाक असे प्रश्न निर्माण करण्यामागची भूमिका समाजाने लक्षात घेण्याची वेळ आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि समाजवादी नेते भाई वैद्य यांनी बुधवारी (२६ जुलै) केले. ते मंथन विचारपीठातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होते.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात हा कार्यक्रम झाला. भाई वैद्य यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. त्यानिमित्ताने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देशभरातील सद्यस्थितीवर त्यांनी उपस्थितांशी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रताप बोराडे होते. व्यासपीठावर सुभाष लोमटे, ज्ञानप्रकाश मोदाणी यांची उपस्थित होती. भाई वैद्य म्हणाले, ‘देशापुढे जागतिकीकरण व जमातवाद ही मोठी आव्हाने आहेत. केंद्रातील सरकारला धर्माधिष्ठीत राष्ट्र निर्माण करावयाचे असल्याने त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहेत. केंद्रातील सरकार मोदी किंवा भाजपचे नाही, तर संघांचे आहे. धार्मिक भूमिका प्रभावी करून हिंदू विचार वाढविण्यावर त्यांचा भर आहे. दुसऱ्या समाजाला दुय्यम वागणूक देत त्यांना शत्रू समजायचे असा त्यांचा विचार असून खोटे बोलण्यात संघाचा हात कोणी धरू शकत नाही. जागतिकीकरणामुळे बेरोजगारी, विषमता वाढली. शिक्षण, आरोग्यासारख्या गरजांकडे दुर्लक्ष होते आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रताप बोराडे, डॉ. भालचंद्र कानगो, रमेश खंडागळे, शेख इकबाल मिन्ने, प्रा. विजय दिवाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष लोमटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
वित्तीय भांडवलशाहीचे युग
‘पूर्वीच्या काळात उद्योग क्षेत्रामुळे रोजगार मिळायचा. आज मात्र कामगारांना रोजगाराऐवजी संधी कमी करणारे उद्योगधोरण ठरत आहे. आधुनिकता आणण्याच्या नावाखाली हे केले जात आहे. उत्पादन वाढत असताना कामगार कमी करण्यावर उद्योगांचा प्रयत्न असतो. हे वित्तीय भांडवलशाहीच युग आहे,’ असे भाई वैद्य म्हणाले.