अ‍ॅपशहर

‘मुस्लिम भागांतील एटीएम रिकामी’

मुस्लिम भागातील एटीएममध्ये केंद्र सरकार जाणीवपूर्वक पैसे टाकत नसल्याचा आरोप ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

Maharashtra Times 14 Dec 2016, 2:57 pm
नांदेड : मुस्लिम भागातील एटीएममध्ये केंद्र सरकार जाणीवपूर्वक पैसे टाकत नसल्याचा आरोप ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atms in muslim areas is cashless
‘मुस्लिम भागांतील एटीएम रिकामी’


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे नगरपालिका निवडणुकीसाठी सभा झाली. या सभेमध्ये ओवेसी बोलत होते. या सभेला शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली. हा निर्णय मुस्लिम समाजासाठी खूपच तापदायक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘नोटाबंदीचा निर्णय हा मुस्लिम समाजाला तापदायक झाला आहे. मुस्लिम भागांमध्ये असणारी एटीएम रिकामी आहेत. येथील बँका उघडल्या जात नाहीत आणि जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.’

ओवेसी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, लोक आज पैसे काढण्यासाठी रांगेत उभे आहेत. हेच लोक तुमच्या विरोधात मतदान करण्यासाठी पुन्हा एकदा रांगेत उभे राहतील.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज