फुलंब्री : तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या ३४८ कामावर सुमारे चार हजार मजुरांनी काम केले, मात्र मजुरी न मिळाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडे मजुरांची ६८ लाख ५१ हजार १३६ रुपये थकबाकी आहे.
तालुक्यात एक एप्रिल ते ३० एप्रिल २०१६ या कालवधीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली आहेत. त्यानंतर ही कामे बंद झाली. पण, या कामांवर काम केलेल्या मजुरांना मजुरी देण्याची आठवण कोणालाच राहिलेली नाही. दुष्काळात होरपळणारे मजूर व शेतमजुरांची उपासमार होत असल्याने त्यांना कामाची प्रतीक्षा होती. ऐन दुष्काळात कामे निघाल्याने चार हजार मजूर कामावर गेले. त्यांनी तळपत्या उन्हात काम केले, कामाचे मोजमाप करून मजुरीची रक्कम नावावर नोंदवण्यात आली आहे.
रोजगार हमी योजनेच्या कामामुळे तालुक्यातील स्थलांतर टळले पण मजुरी मिळाली नसल्याने मजुरांची उपासमार होत आहे. त्याबद्दल मजुरांकडून विचारणा केली असता शासकीय पैसा आहे, मिळेल, असे उत्तर मिळत असल्याचे सांगण्यात आले. मजुरी मिळणार असल्याने अनेकांनी उधार ऊसनवार करून उदरनिर्वाह केला. आता वसुलीसाठी तगादा लावत आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी गटविकास अधिकारी विजय परदेशी यांच्याकडे संपर्क केला. मात्र, त्यांचा मोबाइल बंद होता. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांनी फोन उचलला नाही.
तालुक्यात एक एप्रिल ते ३० एप्रिल २०१६ या कालवधीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली आहेत. त्यानंतर ही कामे बंद झाली. पण, या कामांवर काम केलेल्या मजुरांना मजुरी देण्याची आठवण कोणालाच राहिलेली नाही. दुष्काळात होरपळणारे मजूर व शेतमजुरांची उपासमार होत असल्याने त्यांना कामाची प्रतीक्षा होती. ऐन दुष्काळात कामे निघाल्याने चार हजार मजूर कामावर गेले. त्यांनी तळपत्या उन्हात काम केले, कामाचे मोजमाप करून मजुरीची रक्कम नावावर नोंदवण्यात आली आहे.
रोजगार हमी योजनेच्या कामामुळे तालुक्यातील स्थलांतर टळले पण मजुरी मिळाली नसल्याने मजुरांची उपासमार होत आहे. त्याबद्दल मजुरांकडून विचारणा केली असता शासकीय पैसा आहे, मिळेल, असे उत्तर मिळत असल्याचे सांगण्यात आले. मजुरी मिळणार असल्याने अनेकांनी उधार ऊसनवार करून उदरनिर्वाह केला. आता वसुलीसाठी तगादा लावत आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी गटविकास अधिकारी विजय परदेशी यांच्याकडे संपर्क केला. मात्र, त्यांचा मोबाइल बंद होता. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांनी फोन उचलला नाही.