अ‍ॅपशहर

पन्नास हजारांची सोनसाखळी पळवली

Maharashtra Times 31 Mar 2016, 3:00 am

पन्नास हजारांची सोनसाखळी पळवली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad crime
पन्नास हजारांची सोनसाखळी पळवली

सुपारी हनुमान परिसरातील घटना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तरुणाला मारहाण करीत ५० हजारांची सोनसाखळी तिघांनी पळवली. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुपारी हनुमान मंदिरासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य दिलीप जायस्वाल (रा. रंगारगल्ली) हा तरुण सुपारी हनुमान मंदिर परिसरात नारळ व उदबत्ती घेण्यास गेला होता. हे साहित्य घेऊन अजिंक्य घरी परतत होता. यावेळी त्याला रोहित रमेश खाकोरडिया, संजू व खाकोरडियाचा मेव्हणा या तिघांनी अडवले. ‘आमच्याकडे रागाने का बघतोस’, असे म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोहितने फायटरने गळ्यावर, पोटावर, मानेवर मारून त्याला जखमी केले. तर संजूने अजिंक्यच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून त्याला चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या मेव्हण्याने धक्काबुक्की करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अजिंक्यच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज