म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३ लाख ५९ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ८१ हजार शौचालये नऊ तालुक्यांत बांधण्यात आली. उर्वरित ६८ हजारांचे उद्दिष्ट डिसेंबरअखेर पूर्ण केले जाईल आणि जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त होईल, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
सीईओ अर्दड म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्षभराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका, गावकऱ्यांशी संवाद, यंत्रणेकडून सातत्यपूर्ण काम करण्यात आले. सप्टेंबरअखेर २ लाख ८१ हजार शौचालये बांधण्यात आली असून उर्वरित ६८ हजार शौचालयांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण केले जाईल. शेवटच्या टप्प्यात हे काम पूर्ण करताना अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. गावकरी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने उद्दिष्टपूर्ती होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनेक गावांमधून शौचालये बांधकामाच्या तक्रारी आल्या आहेत, याबाबत काय ? असे विचारले असता अर्दड म्हणाले, काही गावांमधून शौचालयांच्या कामाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी गुरुवारी आम्ही हनुमंतगाव येथे जाऊन आलो. हे गाव निर्मलग्राममध्ये आहे. त्यामुळे येथे शौचालये बांधताना अनुदानाच्या अडचणी आहेत. मात्र आम्ही त्यावर मार्ग सूचविला आहे. खतियाबाद व वरझडी या गावात सेफ्टी टँक एकेक केल्याच्या तक्रारी केल्या. त्याची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. जिथे बोगस काम झाले असेल आणि ते आढळले तर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशा विश्वास त्यांनी दिला.
दोन तालुक्यात यश
शौचालये बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. जिल्ह्याला २२० कोटींची आवश्यकता असून टप्प्याटप्प्याने येणारे अनुदान प्रशासनाकडून कामे झालेल्या गावांना वितरित केले जात असल्याचे सीईओ अर्दड यांनी स्पष्ट केले. नऊ तालुक्यांपैकी फुलंब्री आणि खुलताबाद हे दोन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३ लाख ५९ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ८१ हजार शौचालये नऊ तालुक्यांत बांधण्यात आली. उर्वरित ६८ हजारांचे उद्दिष्ट डिसेंबरअखेर पूर्ण केले जाईल आणि जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त होईल, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
सीईओ अर्दड म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्षभराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका, गावकऱ्यांशी संवाद, यंत्रणेकडून सातत्यपूर्ण काम करण्यात आले. सप्टेंबरअखेर २ लाख ८१ हजार शौचालये बांधण्यात आली असून उर्वरित ६८ हजार शौचालयांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण केले जाईल. शेवटच्या टप्प्यात हे काम पूर्ण करताना अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. गावकरी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने उद्दिष्टपूर्ती होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनेक गावांमधून शौचालये बांधकामाच्या तक्रारी आल्या आहेत, याबाबत काय ? असे विचारले असता अर्दड म्हणाले, काही गावांमधून शौचालयांच्या कामाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी गुरुवारी आम्ही हनुमंतगाव येथे जाऊन आलो. हे गाव निर्मलग्राममध्ये आहे. त्यामुळे येथे शौचालये बांधताना अनुदानाच्या अडचणी आहेत. मात्र आम्ही त्यावर मार्ग सूचविला आहे. खतियाबाद व वरझडी या गावात सेफ्टी टँक एकेक केल्याच्या तक्रारी केल्या. त्याची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. जिथे बोगस काम झाले असेल आणि ते आढळले तर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशा विश्वास त्यांनी दिला.
दोन तालुक्यात यश
शौचालये बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. जिल्ह्याला २२० कोटींची आवश्यकता असून टप्प्याटप्प्याने येणारे अनुदान प्रशासनाकडून कामे झालेल्या गावांना वितरित केले जात असल्याचे सीईओ अर्दड यांनी स्पष्ट केले. नऊ तालुक्यांपैकी फुलंब्री आणि खुलताबाद हे दोन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.