मटा ऑनलाइन वृत्त | औरंगाबाद
औरंगाबाद येथील लक्ष्मीनगर परिसरातील सॅमसंग कंपनीच्या गोदामाला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग ओटोक्यात आणली.
वाळुंज परिसरातील बाफना मोटर्स शेजारच्या सॅमसंगच्या गोदामाला रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात टीव्ही, फ्रीज, एलईडी असे इलेक्ट्रॉनिस साहित्य होते. रात्री नऊच्या सुमारास व्यवस्थापक मुकुंद येवतेकर आणि मुळे गोदाम बंद करून घरी गेले होते. रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक विजय मानवतकर आणि हाके यांना गोदामामधून धूर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन केला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दालाच्या गाड्यांमधील पाणी कमी पडल्याने काही खासगी टँकरही बोलवण्यात आले.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदामामध्ये ५००हून अधिक फ्रीज आणि वॉशिंग मशिन्स होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गोदामाजवळ सुगंधी द्रव्याचे उत्पादन करणारा कारखाना आहे. आग या कारखान्यापर्यंत पोहोचली असती तर भीषणता आणखी वाढली असती.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाक्यांच्या स्टॉल्सना भीषण आग लागली होती. या आगीत १४२ स्टॉल जळून खाक झाले होते. तर मैदानातील १००हून अधिक दुचाकी, ४ चार चाकी आणि रिक्षांचे नुकसान झाले होते.
औरंगाबाद येथील लक्ष्मीनगर परिसरातील सॅमसंग कंपनीच्या गोदामाला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग ओटोक्यात आणली.
वाळुंज परिसरातील बाफना मोटर्स शेजारच्या सॅमसंगच्या गोदामाला रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात टीव्ही, फ्रीज, एलईडी असे इलेक्ट्रॉनिस साहित्य होते. रात्री नऊच्या सुमारास व्यवस्थापक मुकुंद येवतेकर आणि मुळे गोदाम बंद करून घरी गेले होते. रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक विजय मानवतकर आणि हाके यांना गोदामामधून धूर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन केला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दालाच्या गाड्यांमधील पाणी कमी पडल्याने काही खासगी टँकरही बोलवण्यात आले.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदामामध्ये ५००हून अधिक फ्रीज आणि वॉशिंग मशिन्स होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गोदामाजवळ सुगंधी द्रव्याचे उत्पादन करणारा कारखाना आहे. आग या कारखान्यापर्यंत पोहोचली असती तर भीषणता आणखी वाढली असती.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाक्यांच्या स्टॉल्सना भीषण आग लागली होती. या आगीत १४२ स्टॉल जळून खाक झाले होते. तर मैदानातील १००हून अधिक दुचाकी, ४ चार चाकी आणि रिक्षांचे नुकसान झाले होते.