म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील ज्येष्ठ नागरिक पूर्ण संख्येने लसीकरणाकडे न वळल्यामुळे महापालिकेकडे तब्बल ३५ हजार लशी शिल्लक आहेत. करोना प्रतिबंध रोखण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.
केंद्र सरकारने करोना प्रतिबंधासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम देशभरात सुरू केली आहे. औरंगाबाद शहरात देखीलही मोहीम महापालिकेने सुरू केली. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने मेगा लसीकरण मोहीम सुरू केली, त्यासाठी ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या निर्देशानुसार या लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण केले जात आहे. आता सरकारने ४५ आणि त्यावरच्या वयोगटासाठी कोव्हीशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केले आहे. त्यामुळे लसीकरणासाठीची गर्दी कमी झाली आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण तूर्त बंद करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर लशी शिल्लक राहू लागल्या आहेत.
जनजागृती करणार
डॉ. नीता पाडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून महापालिकेला ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पंधरा दिवसांत ४१ हजार लशी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेकडे अगोदरच्या आठ हजार लस शिल्लक होत्या. त्यामुळे लशींचा ४९ हजारांचा साठा पालिकेकडे होता, त्यातून आता ३५ हजार लशी शिल्लक राहिल्या आहेत. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी जनजागृती करावी लागेल, यासाठी चेतना सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.
शहरातील ज्येष्ठ नागरिक पूर्ण संख्येने लसीकरणाकडे न वळल्यामुळे महापालिकेकडे तब्बल ३५ हजार लशी शिल्लक आहेत. करोना प्रतिबंध रोखण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.
केंद्र सरकारने करोना प्रतिबंधासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम देशभरात सुरू केली आहे. औरंगाबाद शहरात देखीलही मोहीम महापालिकेने सुरू केली. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने मेगा लसीकरण मोहीम सुरू केली, त्यासाठी ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या निर्देशानुसार या लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण केले जात आहे. आता सरकारने ४५ आणि त्यावरच्या वयोगटासाठी कोव्हीशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केले आहे. त्यामुळे लसीकरणासाठीची गर्दी कमी झाली आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण तूर्त बंद करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर लशी शिल्लक राहू लागल्या आहेत.
जनजागृती करणार
डॉ. नीता पाडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून महापालिकेला ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पंधरा दिवसांत ४१ हजार लशी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेकडे अगोदरच्या आठ हजार लस शिल्लक होत्या. त्यामुळे लशींचा ४९ हजारांचा साठा पालिकेकडे होता, त्यातून आता ३५ हजार लशी शिल्लक राहिल्या आहेत. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी जनजागृती करावी लागेल, यासाठी चेतना सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.