म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अतिक्रमण निर्मुलनाबरोबरच महापालिकेने आता शहरातील भंगार वाहनांकडे मोर्चा वळविला आहे. कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभी असलेली भंगार वाहने महापालिका जप्त करणार आहे. वाहन मालकांनी त्या गाड्या स्वत:च्या ताब्यात घ्याव्यात व रस्ता मोकळा करावा यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांनंतर पालिका त्या गाड्या जप्त करणार आहे.
शहरातील वाहतुकीची कोंडी फुटावी म्हणून महापालिकेने रस्त्यांचे रुंदीकरण केले. रुंद केलेल्या रस्त्यांचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण तर, काही ठिकाणी डांबरीकरणदेखील करण्यात आले आहे, परंतु रुंद केलेले रस्ते वाहनांनी अडवले असून त्यामुळे ते पुन्हा अरुंद झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत भंगार वाहने पडून आहेत. वारंवार सूचना करुनदेखील ती उचलली जात नाहीत, त्यामुळे महापालिकेने आता टोकाची भूमिका घेतली आहे.
रस्त्यांच्या बाजूने उभी असलेली नादुरुस्त अशी चारचाकी, तीन चाकी, दोन चाकी वाहने संबंधितांनी त्वरित उचलून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासकांच्या स्वाक्षरीनेच हे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या बाजूने उभ्या असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांची साफसफाई करण्यासदेखील त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्यामुळे कचरा साचून राहतो. त्यामुळे वाहनधारकांनी व गॅरेज मालकांनी रस्त्याच्या बाजूला उभी करुन ठेवलेली वाहने तात्काळ हटवावीत, सात दिवसांत त्यांनी आपली वाहने हटवली नाहीत तर महापालिका ती वाहने जप्त करेल असे प्रशासकांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने अशाच प्रकारची कारवाई करुन रस्त्यांच्या बाजूने उभी असलेली भंगार वाहेन जप्त केली होती. जप्त केलेली सर्व वाहने गरवारे क्रीडा संकुलाच्या पार्किंगच्या जागेत जमा केली होती. या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णयदेखील महापालिकेने घेतला होता, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
रस्त्याच्या बाजूला अनेक दिवसांपासून उभी असलेली भंगार वाहने जप्त करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहे. आता जप्त केली जाणारी वाहने व पूर्वी जप्त केलेली वाहने याचा एकत्रित लिलाव करण्याचा विचार केला जाईल.
रवींद्र निकम
अतिरिक्त आयुक्त, महापालिका
वाहनांनी केले रस्ते गिळंकृत
महापालिकेने भंगार वाहनांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिलेला असला तरी चांगली, सुस्थितीतील वाहनेदेखील रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे रुंद रस्ते अधिकच अरुंद झाले आहेत. वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. वाहतूक कोंडीची समस्या यामुळे निर्माण होत आहे. पार्किंगसाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था न केल्यामुळे रात्रीच्या वेळी बहुतेक रस्ते वाहनांमुळे भरुन जातात. दिवसाही अनेक भागात असे चित्र पाहण्यास मिळते.
अतिक्रमण निर्मुलनाबरोबरच महापालिकेने आता शहरातील भंगार वाहनांकडे मोर्चा वळविला आहे. कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभी असलेली भंगार वाहने महापालिका जप्त करणार आहे. वाहन मालकांनी त्या गाड्या स्वत:च्या ताब्यात घ्याव्यात व रस्ता मोकळा करावा यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांनंतर पालिका त्या गाड्या जप्त करणार आहे.
शहरातील वाहतुकीची कोंडी फुटावी म्हणून महापालिकेने रस्त्यांचे रुंदीकरण केले. रुंद केलेल्या रस्त्यांचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण तर, काही ठिकाणी डांबरीकरणदेखील करण्यात आले आहे, परंतु रुंद केलेले रस्ते वाहनांनी अडवले असून त्यामुळे ते पुन्हा अरुंद झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत भंगार वाहने पडून आहेत. वारंवार सूचना करुनदेखील ती उचलली जात नाहीत, त्यामुळे महापालिकेने आता टोकाची भूमिका घेतली आहे.
रस्त्यांच्या बाजूने उभी असलेली नादुरुस्त अशी चारचाकी, तीन चाकी, दोन चाकी वाहने संबंधितांनी त्वरित उचलून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासकांच्या स्वाक्षरीनेच हे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या बाजूने उभ्या असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांची साफसफाई करण्यासदेखील त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्यामुळे कचरा साचून राहतो. त्यामुळे वाहनधारकांनी व गॅरेज मालकांनी रस्त्याच्या बाजूला उभी करुन ठेवलेली वाहने तात्काळ हटवावीत, सात दिवसांत त्यांनी आपली वाहने हटवली नाहीत तर महापालिका ती वाहने जप्त करेल असे प्रशासकांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने अशाच प्रकारची कारवाई करुन रस्त्यांच्या बाजूने उभी असलेली भंगार वाहेन जप्त केली होती. जप्त केलेली सर्व वाहने गरवारे क्रीडा संकुलाच्या पार्किंगच्या जागेत जमा केली होती. या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णयदेखील महापालिकेने घेतला होता, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
रस्त्याच्या बाजूला अनेक दिवसांपासून उभी असलेली भंगार वाहने जप्त करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहे. आता जप्त केली जाणारी वाहने व पूर्वी जप्त केलेली वाहने याचा एकत्रित लिलाव करण्याचा विचार केला जाईल.
रवींद्र निकम
अतिरिक्त आयुक्त, महापालिका
वाहनांनी केले रस्ते गिळंकृत
महापालिकेने भंगार वाहनांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिलेला असला तरी चांगली, सुस्थितीतील वाहनेदेखील रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे रुंद रस्ते अधिकच अरुंद झाले आहेत. वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. वाहतूक कोंडीची समस्या यामुळे निर्माण होत आहे. पार्किंगसाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था न केल्यामुळे रात्रीच्या वेळी बहुतेक रस्ते वाहनांमुळे भरुन जातात. दिवसाही अनेक भागात असे चित्र पाहण्यास मिळते.