अ‍ॅपशहर

करोना योद्धा नावालाच! रुग्णवाहिका चालकांना ४ महिन्यांपासून पगार नाही, घर कसं चालणार?

वेतन थकल्यामुळे अनेकदा १०८ रुग्णवाहिकावरील चालकांनी आंदोलन केली आहेत. मात्र आंदोलन केल्यानंतर एखाद्या-दुसऱ्या महिन्याचे पगार देऊन डोळे पुसण्याचे काम केलं जातं. मात्र त्यानंतर पुन्हा वेळेवर पगार दिले जात नाही.

Maharashtra Times 15 Jan 2022, 9:09 am
औरंगाबाद : करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फ्रंट लाईन वर्कर यांच्या कामचं मोठं कौतुक झालं. ज्यात आरोग्य विभागाचं मोठं योगदान आहे. पण फक्त कौतुकाने घर चालत नाही, असं म्हणण्याची वेळ शासकीय रुग्णवाहिका चालकांवर आली आहे. कारण, गेल्या चार महिन्यांपासून या रुग्णवाहिका चालकांचे पगार थकले असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambulance


काँग्रेस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका आजही हजारो लोकांना रोज जीवनदान देणारी ठरत आहे. विशेष म्हणजे करोना काळात या रुग्णवाहिकेचं योगदान महत्वाचं ठरलं. पण या रुग्णवाहिकावर काम करणाऱ्या चालकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही. आता पुन्हा एकदा गेल्या चार महिन्यांपासून या चालकांचे वेतन थकले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अशा जवळपास ३३ रुग्णवाहिका असून यावरील चालकांचे पगार थकले आहेत.

दुकानांच्या मराठी पाट्यात गैर काय ?, सरकारी निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया
अनेकदा आंदोलन केलं पण...

वेतन थकल्यामुळे अनेकदा १०८ रुग्णवाहिकावरील चालकांनी आंदोलन केली आहेत. मात्र आंदोलन केल्यानंतर एखाद्या-दुसऱ्या महिन्याचे पगार देऊन डोळे पुसण्याचे काम केलं जातं. मात्र त्यानंतर पुन्हा वेळेवर पगार दिले जात नाही. त्यामुळे एकीकडे करोना योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि दुसरीकडे वेतन थांबवून अडवणूक करायची यामुळे चालक हतबल झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज