अ‍ॅपशहर

Breaking News: मराठवाड्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 'तीस-तीस' घोटाळ्यात गुन्हा दाखल

tis tis Scam : गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, अधिकारी, राजकीय नेत्यांनी या तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक केली होती.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Jan 2022, 8:43 pm
औरंगाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या तीस तीस घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, अधिकारी, राजकीय नेत्यांनी या तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक केली होती. मात्र वर्षभरापासून या योजनेचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोड पैसे परत देतो म्हणून टाळाटाळ करत होता. तर काही दिवस यो फरार सुद्धा झाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aurangabad Police Resister FIR Against Accussed in tis tis Scam


तीस-तीस घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी संतोष राठोडला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी संतोष राठोड याने महाराष्ट्र टाइम्सला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देत स्वतः ६० ते ७० कोटींची लोकांनी माझ्याकडे गुंतवणूक केल्याचं कबूल केलं होतं. मात्र प्रत्यक्षात ४०० ते ५०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं बोलले जात आहे आहे. तर आता याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे तीस-तीस घोटाळा.?

मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी या प्रकल्पात शेकडो शेतकऱ्यांची जमीन गेली होती. ज्याचा कोट्यवधी रुपयांचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला होता. हेच लक्षात घेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने या शेतकऱ्यांना माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळावा अशी योजना आणली. सुरवातीला काही नातेवाईकांना या योजनेत घेऊन त्यांना चांगला परतावा देत राठोड याने स्वतःची मार्केटिंग केली.

गावात आलिशान गाड्यांचा ताफा,पोते भरून लोकांना पैसे परत करणे हे सर्व चित्र निर्माण करत राठोड चर्चेत आला आणि पाहता पाहता लोकांनी घरदार,जमिनी, प्लॉट विकून राठोड कडे पैसे गुंतवले. मात्र गेल्या वर्षभरापासून व्याज सोडा मुद्दल सुध्दा लोकांना परत मिळाले नाहीत. त्यामुळे अखेर आज ( शुक्रवारी ) दौलत जगन्नाथ राठोड नावाच्या व्यक्तीने पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलीस पथक राठोडच्या शोधात रवाना झाली आहे.

यापूर्वीही गुन्हा दाखल

विशेष म्हणजे यापूर्वी एका महिलेने राठोड विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी महिलेने कोर्टात आपण तक्रार माघे घेत असल्याची लेखी दिल्याने राठोड याला जामीन मिळाला होता. पण आता आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने राठोडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज