अ‍ॅपशहर

ram mandir : राम मंदिराचं ई-भूमिपूजन? उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच नाही; दानवेंचा हल्लाबोल

करोनाचा प्रादुर्भाव असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) स्वत: पंढरपूरला पूजेसाठी गेले होते. त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय?, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( raosaheb danve) यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2020, 9:39 am
औरंगाबाद: अयोध्येतील राम मंदिराचं ई-भूमिपूजन करण्यात यावं या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव असताना उद्धव ठाकरे स्वत: पंढरपूरला पूजेसाठी गेले होते. त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनावर बोलण्याचा अधिकारच काय?, असा खोचक सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raosaheb danve-uddhav thackeray


राम मंदिराचं ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण ते स्वत: जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. राज्यात करोनाचं संकट असतानाही ते पूजेला गेले होते. अशी टीका दानवे यांनी केली आहे. ठाकरे यांनी विठ्ठलाची पूजा ऑनलाइन पद्धतीने केली असती तर त्यांना बोलण्याचा आणि सल्ला देण्याचा अधिकार होता. मात्र, स्वत: करोना काळात महापूजा करायची आणि दुसऱ्यांना करोना आहे म्हणून ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला द्यायचा हा दुटप्पीपणा आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल दानवे यांना करण्यात आला. त्यावर, शरद पवार हे मुख्यमंत्री नाहीत, पण महाविकास आघाडीचे कर्णधार आहेत, असं ते म्हणाले.

आघाडी सरकारचं भविष्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही; उद्धव ठाकरे कडाडले

फडणवीसांना अमित शहा हे आदेश बांदेकरांसारखे वाटले असतील: cm ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक 'सामना'ला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी करोनाचं संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं, असा सल्ला दिला होता. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही? एक व्यक्ती म्हणून हो की नाही हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. एखाद्या गावात मंदिर बांधायचं असेल तर मोठा जल्लोष केला जातो. लोक मंदिर निर्माणाच्या कार्यात भाग घेतात. उत्सुकता असते. चैतन्य सळसळतं. अयोध्येतील राम मंदिर हे काही सर्वसामान्य मंदिर नाही. या मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. इतिहास आहे. हा जागतिक कुतुहुलाचा विषयही आहे. रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट पाहत होते. त्यांच्या भावनेचं काय करणार? लाखो राम भक्तांना राम मंदिराच्या भूमिपूजनाला येऊ देणार की अडवणार? कि कळत न कळत त्यांच्यात करोनाचा प्रसार होऊ देणार? असा सवाल करतानाच करोनामुळे आपण नागरिकांना मंदिरातही जाण्यास बंदी घातली आहे. अशावेळी तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही भूमिपूजन करू शकता. ई-भूमिपूजनही करू शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवाय भूमिपूजन सोहळ्याला जाणार की नाही? याबाबत त्यांनी कोणतंच सूतोवाच केलं नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राम मंदिराला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही; राष्ट्रवादीने केले स्पष्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज