म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहर व जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत पाच टक्क्यांनी वाढल्यामुळे नागरिकांना व आरोग्य यंत्रणांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांत १४ हजार २५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून औरंगाबाद शहरात करोनाची दुसरी लाट आली आहे. मार्च महिन्यात या लाटेने तीव्र रूप धारण केले. सव्वा महिन्याच्या काळात करोनाबाधितांची संख्या वाढली; तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले. त्याचा परिणाम म्हणून बरे होण्याचा दर कमी होण्यावर झाला. मार्च महिन्यात हा दर १२५ टक्क्यांवरुन ७७ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यामुळे चिंता वाढली. रिकव्हरी रेट वाढवण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांच्यासमोर निर्माण झाले. करोना आजाराच्या नियंत्रणासाठी सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबादमध्ये एक एप्रिलपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. सहा एप्रिलपासून महापालिकेने मेगा लसीकरण मोहीम सुरू केली. रुग्ण बरे होण्यासाठी व मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा दिवसांत पाच टक्क्यांनी वाढले आहे. पालिकेच्या अहवालानुसार शनिवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२५८ इतके नोंदवले गेले. १ ते १० एप्रिलच्यादरम्यान शहरासह जिल्ह्यात १४ हजार ७३८ रुग्णांची वाढ झाली आणि १४ हजार २५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थोडे वाढले असले, तरी करोना संसर्गाची स्थिती मात्र अद्याप नियंत्रणात आली नाही. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी (१० एप्रिल) १९६४ रुग्ण नोंदवले गेले. रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे.
१४३५ जणांना सुटी, २९ मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १४३५ करोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात महापालिका कार्यक्षेत्रातील ९०० तर ग्रामीण भागातील ५३५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १२८० बाधितांची वाढ झाली. २९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५ हजार ३८१ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९८ हजार ६९२ झाली आहे. १९८१ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी करोनाबाधितांचा आकडा दोन जवळ पोचला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र त्यात रविवारी चांगलीच घट दिसून आली. दिवसभरात महापालिका कार्यक्षेत्रात ७२० तर ग्रामीण भागात ५६० करोनाबाधितांची भर पडली. २९ जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद शहर व जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत पाच टक्क्यांनी वाढल्यामुळे नागरिकांना व आरोग्य यंत्रणांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांत १४ हजार २५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून औरंगाबाद शहरात करोनाची दुसरी लाट आली आहे. मार्च महिन्यात या लाटेने तीव्र रूप धारण केले. सव्वा महिन्याच्या काळात करोनाबाधितांची संख्या वाढली; तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले. त्याचा परिणाम म्हणून बरे होण्याचा दर कमी होण्यावर झाला. मार्च महिन्यात हा दर १२५ टक्क्यांवरुन ७७ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यामुळे चिंता वाढली. रिकव्हरी रेट वाढवण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांच्यासमोर निर्माण झाले. करोना आजाराच्या नियंत्रणासाठी सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबादमध्ये एक एप्रिलपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. सहा एप्रिलपासून महापालिकेने मेगा लसीकरण मोहीम सुरू केली. रुग्ण बरे होण्यासाठी व मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा दिवसांत पाच टक्क्यांनी वाढले आहे. पालिकेच्या अहवालानुसार शनिवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२५८ इतके नोंदवले गेले. १ ते १० एप्रिलच्यादरम्यान शहरासह जिल्ह्यात १४ हजार ७३८ रुग्णांची वाढ झाली आणि १४ हजार २५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थोडे वाढले असले, तरी करोना संसर्गाची स्थिती मात्र अद्याप नियंत्रणात आली नाही. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी (१० एप्रिल) १९६४ रुग्ण नोंदवले गेले. रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे.
१४३५ जणांना सुटी, २९ मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १४३५ करोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात महापालिका कार्यक्षेत्रातील ९०० तर ग्रामीण भागातील ५३५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १२८० बाधितांची वाढ झाली. २९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५ हजार ३८१ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९८ हजार ६९२ झाली आहे. १९८१ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी करोनाबाधितांचा आकडा दोन जवळ पोचला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र त्यात रविवारी चांगलीच घट दिसून आली. दिवसभरात महापालिका कार्यक्षेत्रात ७२० तर ग्रामीण भागात ५६० करोनाबाधितांची भर पडली. २९ जणांचा मृत्यू झाला.