अ‍ॅपशहर

नागरिकांनो लक्ष द्या, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा होईल बंद

२१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 18 Feb 2022, 8:05 am
औरंगाबाद : जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टीबद्दल महापालिकेला नोटीस पाठवून पाणीपट्टी न भरल्यास २५ फेब्रुवारीपासून जायकवाडी धरणातील पाणीउपसा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. 'शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली जाईल,' असे पत्रकारांशी बोलताना पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water


औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी आवश्यक असलेले पाणी जायकवाडी धरणातून घेण्यासाठी महपालिकेला जलसंपदा विभागात पाणीपट्टी भरावी लागते. परंतु, पालिकेने नोव्हेंबर २०१५ पासून पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीची रक्कम २६ कोटी ३२ लाख २३ हजार रुपये झाली आहे. ही थकबाकी त्वरित न भरल्यास २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

Weather Alert : पुढील ५ दिवस 'या' राज्यांना पावसाचा इशारा, तापमानात होणार वाढ
औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीच्या रकमेपैकी काही रक्कम महापालिका जलसंपदा विभागाला भरेल. मी उधारी चुकती करणारा आयुक्त आहे.

- आस्तिककुमार पांडेय, प्रशासक, औरंगाबाद महापालिका

महत्वाचे लेख