अ‍ॅपशहर

ते चार विद्यार्थी स्वगृही परतले

बुधवारी संध्याकाळी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर एका शाळेच्या गणवेशात असलेले चार विद्यार्थी रडत असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यांची चौकशी केली असता मुलांनी आधी खोटी माहिती पोलिसांनी दिली. नंतर मात्र आपण घरातून पळून जात असल्याचे सांगितले. घराचा पत्ता घेऊन पोलिसांनी मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले.

Maharashtra Times 20 Jan 2017, 3:00 am
पळून जाण्याच्या बेतात असलेले चार विद्यार्थी स्वगृही परतले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
ते चार विद्यार्थी स्वगृही परतले

औरंगाबाद ः
बुधवारी संध्याकाळी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर एका शाळेच्या गणवेशात असलेले चार विद्यार्थी रडत असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यांची चौकशी केली असता मुलांनी आधी खोटी माहिती पोलिसांनी दिली. नंतर मात्र आपण घरातून पळून जात असल्याचे सांगितले. घराचा पत्ता घेऊन पोलिसांनी मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले.
जळगाव येथील पोतदार इंग्लिश स्कूल येथे आठवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी नीलेश गणेश ढगे, गौरव हिलाल महाजन, प्रसाद कैलास सोळुंखे, जयेश गोपाल चौधरी हे चौघे बुधवारी (१८ जानेवारी) सांयकाळी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रडत होते. या मुलांची लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान कांबळे आणि पोलिस उपनिरिक्षक आनंद बन्सोडे यांनी चौकशी केली. आधी त्यांनी आपले अपहरण करून येथे सोडल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आपण घरातून पळून आलो असल्याचे त्यांनी कबूल केले. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्या घरच्यांना माहिती दिली. रात्री उशिरा या चौघांचे पालक औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात आले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानून आपल्या मुलांना परत घेऊन गेले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज