‘समाजस्वास्थ्य’ नाटकाला समकालीन मूल्य
वैचारिक नाटकांची रंगभूमीवर चर्चा
Tushar.bodkhe@timesgroup.com
औरंगाबाद - संततीनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयांवर महत्त्वपूर्ण कार्य करणारे समाजसुधारक र. धों. कर्वे यांच्या जीवनावर आधारीत ‘समाजस्वास्थ्य’ नाटक रंगभूमीवर गाजत आहे. अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’चे लेखन ज्येष्ठ नाटककार प्रा. अजित दळवी यांनी केले आहे. मराठी रंगभूमीवर सातत्याने दर्जेदार नाटक देणाऱ्या प्रा. दळवी यांचे वैचारिक परिघ असलेले नवीन नाटक रसिकांना अंतर्मुख करणारे आहे.
र. धों. कर्वे यांच्यावर आधारीत ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाने एका दुर्लक्षित समाजसुधारकाचे महनीय कार्य पुन्हा एकदा प्रकाशात आणले आहे. दिग्दर्शक अतुल पेठे, लेखक प्रा. अजित दळवी आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचे एकत्र येणे रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. कर्वे यांच्या जीवनावर दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी ‘ध्यासपर्व’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या पटकथा लेखनात प्रा. दळवी यांचा सहभाग होता. हा चित्रपट संततीनियमन या सूत्राभोवती होता. त्यामुळे कर्वे यांच्या जीवनाचे बरेच पैलू दुर्लक्षित राहिले होते. या पैलूंना प्रा. दळवी यांनी नाटकाच्या संहितेत मांडले आहे. ‘फक्त संततीनियमानापुरते कर्वे मर्यादित नाही. प्रगल्भ विवेकवाद, कामविचार आणि स्त्रियांच्या लैंगिकतेबाबतची मोकळीकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे व्यापक कार्य आहे. विशेषतः सध्याचे प्रश्न लक्षात घेतल्यास त्यांच्या कामाला समकालीन मूल्य आहे. आजच्या काळात एका निर्भयी व्यक्तीवरील नाटक विचार करायला उद्युक्त करणारे ठरेल म्हणून लिहिले’ असे नाटककार प्रा. अजित दळवी यांनी सांगितले. पुराणातील आणि मिथ असलेल्या व्यक्तींबद्दल बोलणेही कठीण झाले आहे. महापुरुषांना जातीनुसार वाटून घेतले आहे. यांच्यावर बोलू नका, त्यांच्यावर बोलू नका असे बजावले जात आहे. कर्वे यांनी त्या काळात अत्यंत निर्भयपणे विचारांचा किल्ला लढवला होता. आजच्या काळात कुणाची कोंडी होत असल्यास चिंता करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे वैचारिक नाटकांची मांडणी करण्यात आली असा लेखन प्रवास प्रा. दळवी यांनी उलगडला.
बहुतेक नाटकातील कलाकार फक्त दोन-तीन आठवडे नाटकाची तालीम करतात. मात्र, ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाची तालीम तब्बल साडेचार महिने सुरू होती. कलाकारांची तीन दिवसांची कार्यशाळा घेऊन कर्व्यांचे विचार सांगण्यात आले. कलाकारांनी कर्वे यांच्यावरील ग्रंथ वाचून तालीम केली. अतुल पेठे यांची दिग्दर्शनाची शैली एकदम भिन्न असल्यामुळे नाटक लक्षवेधी ठरले आहे. हिंदी-मराठी चित्रपटात बिझी असूनही गिरीश कुलकर्णी यांनी नाटकासाठी भरपूर वेळ दिला आहे. ‘प्रयोगशील रंगभूमी’ असा लौकीक असलेल्या मराठी रंगभूमीवर नाटकाने ठसा उमटवला आहे. राज्यभर नाटकाचे प्रयोग सुरू असून मराठवाड्यात लवकरच प्रयोग होणार आहेत. या नाटकातून स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे वेगळे पैलू रसिकांना अनुभवता येणार आहेत.
पिरियड प्ले
‘समाजस्वास्थ्य’ नाटक पिरियड प्ले असले तरी रसिकांशी थेट संवाद साधणारे नाटक आहे. कर्वे यांच्यावरील कोर्ट केसेसवर नाटकात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. परंपरागत बुरसटलेल्या विचारांशी झुंज देणाऱ्या र. धों. कर्वे यांचा संघर्ष नाटकात पुरेपूर उतरला आहे. गिरीश कुलकर्णी यांची भूमिका रसिकांना विशेष आवडली असून नाटक प्रयोगाच्या पातळीवर यशस्वी ठरले असे प्रा. दळवी म्हणाले.
वैचारिक नाटकांची रंगभूमीवर चर्चा
Tushar.bodkhe@timesgroup.com
औरंगाबाद - संततीनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयांवर महत्त्वपूर्ण कार्य करणारे समाजसुधारक र. धों. कर्वे यांच्या जीवनावर आधारीत ‘समाजस्वास्थ्य’ नाटक रंगभूमीवर गाजत आहे. अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’चे लेखन ज्येष्ठ नाटककार प्रा. अजित दळवी यांनी केले आहे. मराठी रंगभूमीवर सातत्याने दर्जेदार नाटक देणाऱ्या प्रा. दळवी यांचे वैचारिक परिघ असलेले नवीन नाटक रसिकांना अंतर्मुख करणारे आहे.
र. धों. कर्वे यांच्यावर आधारीत ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाने एका दुर्लक्षित समाजसुधारकाचे महनीय कार्य पुन्हा एकदा प्रकाशात आणले आहे. दिग्दर्शक अतुल पेठे, लेखक प्रा. अजित दळवी आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचे एकत्र येणे रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. कर्वे यांच्या जीवनावर दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी ‘ध्यासपर्व’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या पटकथा लेखनात प्रा. दळवी यांचा सहभाग होता. हा चित्रपट संततीनियमन या सूत्राभोवती होता. त्यामुळे कर्वे यांच्या जीवनाचे बरेच पैलू दुर्लक्षित राहिले होते. या पैलूंना प्रा. दळवी यांनी नाटकाच्या संहितेत मांडले आहे. ‘फक्त संततीनियमानापुरते कर्वे मर्यादित नाही. प्रगल्भ विवेकवाद, कामविचार आणि स्त्रियांच्या लैंगिकतेबाबतची मोकळीकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे व्यापक कार्य आहे. विशेषतः सध्याचे प्रश्न लक्षात घेतल्यास त्यांच्या कामाला समकालीन मूल्य आहे. आजच्या काळात एका निर्भयी व्यक्तीवरील नाटक विचार करायला उद्युक्त करणारे ठरेल म्हणून लिहिले’ असे नाटककार प्रा. अजित दळवी यांनी सांगितले. पुराणातील आणि मिथ असलेल्या व्यक्तींबद्दल बोलणेही कठीण झाले आहे. महापुरुषांना जातीनुसार वाटून घेतले आहे. यांच्यावर बोलू नका, त्यांच्यावर बोलू नका असे बजावले जात आहे. कर्वे यांनी त्या काळात अत्यंत निर्भयपणे विचारांचा किल्ला लढवला होता. आजच्या काळात कुणाची कोंडी होत असल्यास चिंता करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे वैचारिक नाटकांची मांडणी करण्यात आली असा लेखन प्रवास प्रा. दळवी यांनी उलगडला.
बहुतेक नाटकातील कलाकार फक्त दोन-तीन आठवडे नाटकाची तालीम करतात. मात्र, ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाची तालीम तब्बल साडेचार महिने सुरू होती. कलाकारांची तीन दिवसांची कार्यशाळा घेऊन कर्व्यांचे विचार सांगण्यात आले. कलाकारांनी कर्वे यांच्यावरील ग्रंथ वाचून तालीम केली. अतुल पेठे यांची दिग्दर्शनाची शैली एकदम भिन्न असल्यामुळे नाटक लक्षवेधी ठरले आहे. हिंदी-मराठी चित्रपटात बिझी असूनही गिरीश कुलकर्णी यांनी नाटकासाठी भरपूर वेळ दिला आहे. ‘प्रयोगशील रंगभूमी’ असा लौकीक असलेल्या मराठी रंगभूमीवर नाटकाने ठसा उमटवला आहे. राज्यभर नाटकाचे प्रयोग सुरू असून मराठवाड्यात लवकरच प्रयोग होणार आहेत. या नाटकातून स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे वेगळे पैलू रसिकांना अनुभवता येणार आहेत.
पिरियड प्ले
‘समाजस्वास्थ्य’ नाटक पिरियड प्ले असले तरी रसिकांशी थेट संवाद साधणारे नाटक आहे. कर्वे यांच्यावरील कोर्ट केसेसवर नाटकात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. परंपरागत बुरसटलेल्या विचारांशी झुंज देणाऱ्या र. धों. कर्वे यांचा संघर्ष नाटकात पुरेपूर उतरला आहे. गिरीश कुलकर्णी यांची भूमिका रसिकांना विशेष आवडली असून नाटक प्रयोगाच्या पातळीवर यशस्वी ठरले असे प्रा. दळवी म्हणाले.