तरुणाईचा वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार
मालोजी मोहिते,
कॉलेज क्लब रिपोर्टर.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती’
या संत तुकारामांच्या ओळी आजच्या काळात सुद्धा चपखलपणे लागू पडतात. कृषिदिनाचे औचित्य साधून राज्य सरकार "कृषी सप्ताह" साजरा करत आहे. लोकसहभागातून तब्बल ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यात तरुणाईचा सहभाग उत्साहाला नवे उधाण आणणारा ठरला आहे.
तरुणाई म्हटले की धम्माल मस्ती आलीच. त्यासह ही तरुणाई अनेक उपक्रमातून सामाजिक भानही जपते. स्वच्छ भारत अभियान असो की, वृक्षारोपणाचा कार्यक्रम, त्यात तरुणाईचा सहभाग उत्साह वाढवतो. विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांना वृक्षारोपणाचे आव्हान करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोपांची लागवडच केली नाहीतर, त्यांच्या जपणुकीचा संकल्पही केला. ‘भालगाव ग्रुप’ असं नाव देऊन त्या गावाचं चित्र बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील लोकांच्या मदतीने ३०० झाडांची लागवड केली. वृक्षदिंडी काढून वृक्षांचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व घरोघरी जाऊन समजावून सांगितले. या तरुणाईने ग्रामसभेचे आयोजन करून वृक्ष जतन करण्याची गावकऱ्यांना शपथही दिली. तरुणाइच्या या पुढाकाराला गावकरीही साथ देत आहे. आता या रोपांचे संवर्धन गावकऱ्यांच्या मदतीने करण्यासाठी हा ग्रुप प्रयत्न करतो आहे. यामध्ये साई कुमार, राम कंबार, गिरीश जमदाडे, पुंडलिक खंबाट, संदेश कडपे, अतुल मोकळे, अंकुश जाधव, सुमीत जाधव, सोपान कोल्हे या तरुणाईचा सहभाग आहे.
कृषिदिन आम्ही गावकऱ्यांचा मदतीने वृक्ष लागवड करून साजरा केला व वृक्षतोड करणार नाही याची शपथ घेतली. वृक्षांच्या सवंर्धनासाठीही आमचा प्रयत्न अहे.
पवन घुगरे,
विद्यार्थी.
वृक्ष मानवाला किती महत्त्वाचे आहेत हे आम्ही गावातील लोकांना समजावून सांगितले व लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे वचन त्यांच्याकडून घेतले.
विवेक कातमांडे,
विद्यार्थी.
मालोजी मोहिते,
कॉलेज क्लब रिपोर्टर.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती’
या संत तुकारामांच्या ओळी आजच्या काळात सुद्धा चपखलपणे लागू पडतात. कृषिदिनाचे औचित्य साधून राज्य सरकार "कृषी सप्ताह" साजरा करत आहे. लोकसहभागातून तब्बल ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यात तरुणाईचा सहभाग उत्साहाला नवे उधाण आणणारा ठरला आहे.
तरुणाई म्हटले की धम्माल मस्ती आलीच. त्यासह ही तरुणाई अनेक उपक्रमातून सामाजिक भानही जपते. स्वच्छ भारत अभियान असो की, वृक्षारोपणाचा कार्यक्रम, त्यात तरुणाईचा सहभाग उत्साह वाढवतो. विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांना वृक्षारोपणाचे आव्हान करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोपांची लागवडच केली नाहीतर, त्यांच्या जपणुकीचा संकल्पही केला. ‘भालगाव ग्रुप’ असं नाव देऊन त्या गावाचं चित्र बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील लोकांच्या मदतीने ३०० झाडांची लागवड केली. वृक्षदिंडी काढून वृक्षांचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व घरोघरी जाऊन समजावून सांगितले. या तरुणाईने ग्रामसभेचे आयोजन करून वृक्ष जतन करण्याची गावकऱ्यांना शपथही दिली. तरुणाइच्या या पुढाकाराला गावकरीही साथ देत आहे. आता या रोपांचे संवर्धन गावकऱ्यांच्या मदतीने करण्यासाठी हा ग्रुप प्रयत्न करतो आहे. यामध्ये साई कुमार, राम कंबार, गिरीश जमदाडे, पुंडलिक खंबाट, संदेश कडपे, अतुल मोकळे, अंकुश जाधव, सुमीत जाधव, सोपान कोल्हे या तरुणाईचा सहभाग आहे.
कृषिदिन आम्ही गावकऱ्यांचा मदतीने वृक्ष लागवड करून साजरा केला व वृक्षतोड करणार नाही याची शपथ घेतली. वृक्षांच्या सवंर्धनासाठीही आमचा प्रयत्न अहे.
पवन घुगरे,
विद्यार्थी.
वृक्ष मानवाला किती महत्त्वाचे आहेत हे आम्ही गावातील लोकांना समजावून सांगितले व लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे वचन त्यांच्याकडून घेतले.
विवेक कातमांडे,
विद्यार्थी.