अ‍ॅपशहर

लोखंडी पुलावर होणार काँक्रिटीकरण

महावीर चौक ते छावणी रस्त्यावरील निजामकालीन लोखंडी पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वर्षानुवर्षे डांबरीकरणाचे थर टाकले गेले. पण रस्त्यावरून पाणी निचरा होण्यासाठी आजूबाजूला नाल्या नसल्याने पाणी साठून डांबरीकरण उखडून खड्डे पडतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या कामासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Maharashtra Times 18 Sep 2017, 3:00 am
लोखंडी पुलावर होणार काँक्रिटीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
लोखंडी पुलावर होणार काँक्रिटीकरण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावीर चौक ते छावणी रस्त्यावरील निजामकालीन लोखंडी पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वर्षानुवर्षे डांबरीकरणाचे थर टाकले गेले. पण रस्त्यावरून पाणी निचरा होण्यासाठी आजूबाजूला नाल्या नसल्याने पाणी साठून डांबरीकरण उखडून खड्डे पडतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या कामासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
सर्वाधिक रहदारीच्या या रस्त्यावरील लोखंडी पुलाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळूज, पंढरपूर, मुंबई, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना खड्ड्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने हे खड्डे कायमस्वरुपी बुजविणे शक्य नाही. पण पुलावरील रस्त्याला दुसरी उपाययोजन करणेच योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. कारण दुरुस्तीच्या नावाखाली या पुलावर डांबरीकरणाचे थरच्या थर टाकले गेले. त्यामुळे रस्त गुळगुळीत झाला पण रस्त्यावर पडणारे पाणी वाहून जाण्यासाठी काहीच सुविधा केल्या गेल्या नाहीत. परिणामी, पाणी पुलावर साठून राहते. पाण्याचा फटका डांबर मिश्रणाला बसतो आणि डांबरीकरण निखळून जाते. त्यामुळे दरवर्षी काम करूनही खड्डे पडलेले असतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाने एक प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पुलावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ८० मीटर लांब आणि सात मीटर रुंदीच्या या पुलावर काँक्रिटीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये लागणार आहेत. यासाठी स्वतंत्र तरतुदीची मागणी करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुलावरील खड्डे भरण्याचे जे काम सुरू आहे, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कुठल्याच प्रकारचा निधी नाही. अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कंत्राटदारास विनंती करून खड्डे भरणे सुरू केले आहे. काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव मान्य झाल्यास लोखंडी पुलाचा दीर्घकालीन त्रास बंद होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज