अ‍ॅपशहर

लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी दीपा क्षीरसागर

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेचे लेखिका साहित्य संमेलन यंदा बीड येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या दीपा क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी अॅड. उषा दराडे यांची निवड झाली आहे. यासाठी डॉ. सतीश साळुंके यांनी ठराव मांडला, तर अनुमोदन डॉ. भास्कर बडे यांचे होते. या आधीच्या मसापच्या लेखिका संमेलनात ज्येष्ठ साहित्य‌िका अनुराधा वैद्य, डॉ. छाया महाजन, डॉ. वृषाली किन्हाळकर, रेखा बैजल आदींची अध्यक्षपदी निवड झाली होती.

Maharashtra Times 3 Oct 2017, 3:00 am
लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी दीपा क्षीरसागर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी दीपा क्षीरसागर

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेचे लेखिका साहित्य संमेलन यंदा बीड येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या दीपा क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी अॅड. उषा दराडे यांची निवड झाली आहे. यासाठी डॉ. सतीश साळुंके यांनी ठराव मांडला, तर अनुमोदन डॉ. भास्कर बडे यांचे होते. या आधीच्या मसापच्या लेखिका संमेलनात ज्येष्ठ साहित्य‌िका अनुराधा वैद्य, डॉ. छाया महाजन, डॉ. वृषाली किन्हाळकर, रेखा बैजल आदींची अध्यक्षपदी निवड झाली होती.
‘रिपाइं’चा आज मेळावा
औरंगाबादः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिर्डी येथे हीरक महोत्सवी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तीन ऑक्टोबर रोजी आयोजित मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास व पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी आदींची उपस्थिती राहणार असल्याचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी कळवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज