अ‍ॅपशहर

संग्रामनगरचा भुयारी मार्ग कागदावरच

देवानगरी, प्रतापनगर भागातील नागरिकांच्या मागणीवरून संग्रामनगर रेल्वे भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. रेल्वे विभागाकडून भुयारी मार्ग तयार करण्यासाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र, एमएसआरडीसी विभागाकडून रेल्वे विभागाला संमती पत्र न मिळाल्याने भुयारी मार्गाचा प्रस्ताव बाजूला पडला आहे.

Maharashtra Times 13 Dec 2017, 5:06 pm
संग्रामनगरचा भुयारी मार्ग कागदावरच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
संग्रामनगरचा भुयारी मार्ग कागदावरच

रेल्वेला एमएसआरडीसीकडून पत्राची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
देवानगरी, प्रतापनगर भागातील नागरिकांच्या मागणीवरून संग्रामनगर रेल्वे भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. रेल्वे विभागाकडून भुयारी मार्ग तयार करण्यासाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र, एमएसआरडीसी विभागाकडून रेल्वे विभागाला संमती पत्र न मिळाल्याने भुयारी मार्गाचा प्रस्ताव बाजूला पडला आहे.
संग्रामनगर येथील नागरिकांच्या सोयीसाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर साडे पाच कोटीचा प्रसतावही तयार करण्यात आला. रेल्वे अधिकारी, एमएसआरडीसीचे अधिकारी यांची बैठक विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्यासोबत घेण्यात आली. या बैठकीत एमएसआरडीसीने भुयारी मार्गासाठी निधी उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर रेल्वे विभागाने निधी मिळण्यापूर्वीच भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मात्र काम थंडावले आहे.
रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे १२ कोटी रूपये अनामत रक्कम म्हणून रेल्‍वे विभागाकडे पडून आहेत. १२ कोटी रुपयांपैकी पाच कोटी रुपये भुयारी मार्ग तयार करण्यासाठी द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. हा निधी वापरण्यासाठी रेल्वे विभागाला एमएसआरडीसीने समंती पत्र देणे आवश्यक आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून संबंधित विभागाला स्मरण पत्र देण्यात आले आहे, मात्र याबाबत अद्याप एमएसआरडीसीने कोणतीही हालचाल केली नसल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेणार असल्याची माहिती एमएसआरडीसी विभागाकडून देण्यात आली. यामुळे संग्रामनगर रेल्वे भुयारी मार्गाचा विषय बाजूला पडला आहे.

केवळ समंती पत्र देण्यास उशीर होत आहे. त्यामुळे पुढची प्रक्रिया अडली आहे. सर्वसामान्यांची अडचण लक्षात घेऊन भुयारी मार्ग तयार करण्याची कारवाई लवकरात लवकर व्हावी, हीच अपेक्षा आहे.

श्रीमंत गोर्डे पाटील, अध्यक्ष, मेट्रो औरंगाबाद असोसिएशन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज