अ‍ॅपशहर

५ कोटी लिटरची सेवाग्राम वॉटर बँक

दुष्काळी जनतेच्या तहानलेल्या ओठी पाणी झुळझुळ पाणी देण्याचे काम कवठा या लहानशा गावातले सेवाग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील करत आहेत. पाच कोटी लिटरचा सेवाग्राम वॉटर बॅँक हा प्रकल्प उभारून त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर आशेचे नंदनवन फुलवले आहे

Maharashtra Times 30 Apr 2016, 3:00 am
Pramod.Mane@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad water bank
५ कोटी लिटरची सेवाग्राम वॉटर बँक

कवठा (ता. उमरगा) ः दुष्काळी जनतेच्या तहानलेल्या ओठी पाणी झुळझुळ पाणी देण्याचे काम कवठा या लहानशा गावातले सेवाग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील करत आहेत. पाच कोटी लिटरचा सेवाग्राम वॉटर बॅँक हा प्रकल्प उभारून त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर आशेचे नंदनवन फुलवले आहे.

मानवतेच्या भावनेतून आणि समाजाला आपण काही देणे लागतो, हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वतःच्या शेतातील बोअरमधील पाणी न वापरता वॉटर बँक तयार केली. २० लाख रुपये खर्च करून ५ कोटी लिटर पाण्याचा संचय त्यांनी निर्माण केला. गेल्या महिन्यात एक कोटी लिटर पाण्याचे पूजन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पाणीवाले बाबा राजेंद्रसिंह राणा व अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आज या वॉटर बँकमध्ये दोन कोटी लिटर पाणी आहे. आणिबाणीच्या प्रसंगी उपयोगाला येईल, म्हणून ही बँक तयार केली आहे. आज पाणी देण्यावरून गावागावात आणि ‌जिल्ह्याजिल्ह्यात आणि विभागाविभागात जोरदार विरोध केला जात आहे. त्यावेळी विनायकराव पाटील यांनी शेतीला पाणी न देता, ते दोन जमा करून बँक तयार केली. केवळ सेवाभावी वृत्तीने ते ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.

कवठा येथील या बँकेतून एक मे रोजी लातूरला २५ लाख लिटरच्या ५० टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जाणार आहे. पाण्याच्या टंचाईमुळे लातूरमधील जनता हैराण झाली आहे. त्यांना रेल्वेद्वारे पाणी मिळाले असले, तरी आणखी पाण्याची गरज आहे. लातूरमधील पाण्याच्या टंचाईचा विचार करून हे पाणी दिले जाणार आहे. विशेष म्हणजे पाण्याचा किंवा टँकर वाहतुकीचा मोबदला ते घेणार नाहीत. हे पाणी मोफत लातूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग कोल्हे यांची परवानगी घेण्यात आली आहे.

‌भावना बोथट झाल्यामुळे पाणी देण्यास विरोध होत आहे. आज पाणीबाणी आहे. त्यामुळे शेताला पाणी न देता ते वाचवून लातूरकरांना देत आहेत. पाणी वाचवणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश याद्वारे समाजाला देत आहे. सेवाभाव वृत्तीमुळेच हा प्रपंच केला आहे. नद्या, धरणे, नाले यातील पाण्याचे राष्ट्रीयीकरण करावे, या मताचा मी आहे.
-विनायकराव पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज