अ‍ॅपशहर

औरंगाबाद पाणीप्रश्न : अमित शहा आणि फडणवीसांचं नाव घेत जलील यांचा खळबळजनक आरोप

Aurangabad News: भाजप हा आमचा कट्टर राजकीय विरोधक आहे, मात्र तुम्ही पाणी देणार असाल तर मीही सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या मोर्चात सहभागी व्हायला तयार आहे, असं जलील यांनी म्हटलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2022, 1:15 pm
औरंगाबाद : शहरातील पाणीप्रश्नावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imtiyaz jaleel 2
इम्तियाज जलील


'शिवसेना मागील ३० वर्षांपासून औरंगाबादच्या लोकांना वेडं बनवत आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्यांनी दरवर्षी फक्त पाच-पाच टाक्या जरी बांधल्या असत्या तरी पाणीप्रश्न इतका गंभीर झाला नसता. यांनी फक्त हिंदू-मुस्लीम आणि मंदिर-मशीद एवढ्याच मुद्द्यावर राजकारण केलं. पाण्याच्या प्रश्नासाठी मी औरंगााबादच्या जनतेलाही जबाबदार धरतो. कारण जनतेनं कधीही पाण्यासाठी मतदान केलं नाही. शहरातील लोकांनी फक्त हिंदुत्वासाठी मतदान केलं. पाण्यासाठी मतदान केलं असतं तरी आज ही वेळ आली नसती,' असं जलील यांनी म्हटलं आहे.

शहा आणि फडणवीसांवर आरोप

'महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून एमआयएमने खासगी कंपनीला पाण्याचा ठेका द्यायला जोरदार विरोध केला होता. एखादी खासगी कंपनी काही समाजसेवा म्हणून हे काम करणार नव्हती. ती कंपनी शहरात आधी कोट्यवधींची गुंतवणूक करणार आणि नंतर लोकांकडून पैसे वसूल करणार, हे आम्ही सांगत होतो. मात्र ही कंपनी लादण्यासाठी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा दबाव होता,' असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसंच तुम्ही पाणीपुरवठ्याच्या खासगी कंपनीला विरोध करत आहात, ते एकदम योग्य आहे. मात्र आमच्यावर खूप दबाव आहे, असं मंत्रालयातील अधिकारी मला सांगत होते, असंही जलील म्हणाले.

दरम्यान, भाजप हा आमचा कट्टर राजकीय विरोधक आहे, पण तुम्ही पाणी देणार असाल तर मीही सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या मोर्चात सहभागी व्हायला तयार आहे. मात्र भाजप हा पाण्यासाठी नाही तर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मोर्चा काढत असून याने पाणीप्रश्न सुटणार नाही, असा हल्लाबोल इम्तियाज जलील यांनी केला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज