औरंगाबाद: आर्थिक कारणामुळे शहानूर मियाँ दर्गाजवळील रेल्वे रूळावर ४५ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या करण्यासाठी आली होती. विशेष पोलिस अधिकारी सह देवानगरी भागातील महिलांनी नागरिकांनी आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेची समजुत काढून जवाहर नगर पोलिसांच्या हवाली केले. ही घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) ला घडली.
बुधवारी सव्वा पाच वाजे दरम्यान एक पंचेचाळीस वर्षे वयाची महिला आपल्या आठ वर्षीय मुलीसोबत संग्राम नगर रेल्वे रूळावरून जात होती. त्याच काळात चिकलठाणा येथून रेल्वे इंजिन हाॅर्न देत होता. ही घटना विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिली. हे सर्व जणांनी महिला आणि लहान मुलीला रूळावरून बाजूला बसविले. सदर महिला रडत होती. यामुळे देवानगरी भागातील महिला पुढे आल्या. त्यांनी महिलेला व तिच्या मुलीला बाजूला नेऊन विचारणा केली.
काही दिवसापूर्वी मोठ्या मुलीचे लग्न केले. नवराही नाही. काही हजाराचे कर्ज झाले. घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याचे तिने सांगितले. देवानगरी च्या नागरिकांनी पैसे जमा करून देण्याचे सांगितले. तसेच शहानूर वाडीत कमी भाडे असलेले घर देण्याचे सांगितले. मात्र महिलेने इन्कार केला. तीने पुन्हा जीव द्यायला येईल. असे सांगितल्याने जवाहरलाल नगर पोलिस ठाण्यात फोन केला. काही वेळेत टु मोबाईल व्हॅन आली.
शेवटी जवाहर नगर पोलिसांच्या हवाली महिलेला केलं. जवाहर नगर पोलिस ठाण्याचे संतोष पाटील यांनी व महिला कर्मचारी यांनी महिलेची अडचण समजून घेत, तीला समजावून सांगितले. तीला तिच्या घरी पाठवून दिले.
बुधवारी सव्वा पाच वाजे दरम्यान एक पंचेचाळीस वर्षे वयाची महिला आपल्या आठ वर्षीय मुलीसोबत संग्राम नगर रेल्वे रूळावरून जात होती. त्याच काळात चिकलठाणा येथून रेल्वे इंजिन हाॅर्न देत होता. ही घटना विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिली. हे सर्व जणांनी महिला आणि लहान मुलीला रूळावरून बाजूला बसविले. सदर महिला रडत होती. यामुळे देवानगरी भागातील महिला पुढे आल्या. त्यांनी महिलेला व तिच्या मुलीला बाजूला नेऊन विचारणा केली.
काही दिवसापूर्वी मोठ्या मुलीचे लग्न केले. नवराही नाही. काही हजाराचे कर्ज झाले. घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याचे तिने सांगितले. देवानगरी च्या नागरिकांनी पैसे जमा करून देण्याचे सांगितले. तसेच शहानूर वाडीत कमी भाडे असलेले घर देण्याचे सांगितले. मात्र महिलेने इन्कार केला. तीने पुन्हा जीव द्यायला येईल. असे सांगितल्याने जवाहरलाल नगर पोलिस ठाण्यात फोन केला. काही वेळेत टु मोबाईल व्हॅन आली.
शेवटी जवाहर नगर पोलिसांच्या हवाली महिलेला केलं. जवाहर नगर पोलिस ठाण्याचे संतोष पाटील यांनी व महिला कर्मचारी यांनी महिलेची अडचण समजून घेत, तीला समजावून सांगितले. तीला तिच्या घरी पाठवून दिले.