म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारताच्या विविध करप्रणालींना फाटा देत ‘जीएसटी’मुळे (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. यामुळे विविध करांच्या जाचक अटीतून सुटका होण्यास मदत होईल,’ असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (३० ऑगस्ट) अर्थशास्राचे प्राध्यापक, शिक्षक आणि जाणकारांसोबत मुक्तसंवाद आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. जगभरात सुमारे १२० देशांनी ‘जीएसटी’ कर लागू केला आहे. भारताने हा कर लागू करण्याचा प्रस्ताव संसदेत संमत केला. देशभरातील ११ राज्यांनी या कराराला मान्यता दिली आहे. या करामुळे १२ ते १४ विविध करांमधून सुटका मिळावी, हे राज्यांनी मान्य केले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा किचकटपणा आणि त्यातील व्यावहारिकता सर्वसामान्यांना पटतच नव्हती. पण आता जीएसटी कर लागू झाल्याने ही कटकट संपेल, असे पाटील म्हणाले. देशभरातील कर, कर भरण्याची परंपरा, आर्थिक सुधारणांची २५ वर्षे याचा त्यांनी मागोवा घेतला. सध्या देशांत तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत, त्यामुळे कर वेगवेगळे का असावे, ते एका स्वरूपात एकवटले तर, सर्वसामान्यांना फायदा होईल. यामुळे जीएसटीचे सर्वांनी स्वागत करायला हवे. स्थानिकपातळीपासून देशपातळीपर्यंत एकाच कराविषयी सकारात्मक राहायला हवी, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस श्रीरंग देशपांडे, कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांच्यासह प्राध्यापकांची उपस्थिती होती.
‘भारताच्या विविध करप्रणालींना फाटा देत ‘जीएसटी’मुळे (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. यामुळे विविध करांच्या जाचक अटीतून सुटका होण्यास मदत होईल,’ असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (३० ऑगस्ट) अर्थशास्राचे प्राध्यापक, शिक्षक आणि जाणकारांसोबत मुक्तसंवाद आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. जगभरात सुमारे १२० देशांनी ‘जीएसटी’ कर लागू केला आहे. भारताने हा कर लागू करण्याचा प्रस्ताव संसदेत संमत केला. देशभरातील ११ राज्यांनी या कराराला मान्यता दिली आहे. या करामुळे १२ ते १४ विविध करांमधून सुटका मिळावी, हे राज्यांनी मान्य केले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा किचकटपणा आणि त्यातील व्यावहारिकता सर्वसामान्यांना पटतच नव्हती. पण आता जीएसटी कर लागू झाल्याने ही कटकट संपेल, असे पाटील म्हणाले. देशभरातील कर, कर भरण्याची परंपरा, आर्थिक सुधारणांची २५ वर्षे याचा त्यांनी मागोवा घेतला. सध्या देशांत तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत, त्यामुळे कर वेगवेगळे का असावे, ते एका स्वरूपात एकवटले तर, सर्वसामान्यांना फायदा होईल. यामुळे जीएसटीचे सर्वांनी स्वागत करायला हवे. स्थानिकपातळीपासून देशपातळीपर्यंत एकाच कराविषयी सकारात्मक राहायला हवी, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस श्रीरंग देशपांडे, कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांच्यासह प्राध्यापकांची उपस्थिती होती.