अ‍ॅपशहर

विचारांच्या स्पष्टतेबरोबरच शब्दांमध्ये नेमकेपणा हवा

व्यक्त होण्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची आहेच; परंतु विचारांची स्पष्टता व शब्दांमध्ये नेमकेपणा असल्याशिवाय आणि त्या त्या क्षेत्राची परिभाषा माहीत असल्याशिवाय प्रभावीपणे व्यक्त होणे आणि एकूणच भाषा समृद्ध होणे शक्य नाही. अर्थातच, वाचानाने हे शक्य होते आणि त्यामुळेच वाचन, विचार व स्वसंवाद महत्वाचे आहेत, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक अतुल पेठे यांनी रविवारी (२३ एप्रिल) शहरात व्यक्त केले.

Maharashtra Times 23 Apr 2017, 7:42 pm
विचारांच्या स्पष्टतेबरोबरच शब्दांमध्ये नेमकेपणा हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangbad times
विचारांच्या स्पष्टतेबरोबरच शब्दांमध्ये नेमकेपणा हवा

वाचकांशी संवाद कार्यक्रमात दिग्दर्शक-लेखक अतुल पेठे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
व्यक्त होण्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची आहेच; परंतु विचारांची स्पष्टता व शब्दांमध्ये नेमकेपणा असल्याशिवाय आणि त्या त्या क्षेत्राची परिभाषा माहीत असल्याशिवाय प्रभावीपणे व्यक्त होणे आणि एकूणच भाषा समृद्ध होणे शक्य नाही. अर्थातच, वाचानाने हे शक्य होते आणि त्यामुळेच वाचन, विचार व स्वसंवाद महत्वाचे आहेत, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक अतुल पेठे यांनी रविवारी (२३ एप्रिल) शहरात व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशन व गुरू एजन्सीच्या वतीने ‘मनोविकास ग्रंथोत्सव २०१७’निमित्त वाचक-लेखक संवाद हा छोटेखानी कार्यक्रम कॅनॉट प्लेसमधील गुरू एजन्सीच्या दालनासमोर झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राजहंस प्रकाशनचे श्याम देशपांडे, एमआयटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद निकाळजे, नीना निकाळजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्त वाचकांशी संवाद साधताना अतुल पेठे म्हणाले, भाषा जिवंत राहण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. वाचनामुळेच विचारांमध्ये प्रग्लभता व स्पष्टता येते आणि वाचनामुळेच विचारांचा स्वसंवाद सुरू होऊ शकतो आणि स्वसंवादानंतरच नेमक्या शब्दांत व्यक्त होता येऊ शकते. व्यक्त होण्यासाठी लागणारी नेमक्या शब्दांची निवड आणि एकूणच शब्दसंपत्ती ही वाचनामुळेच येऊ शकते. त्याचवेळी त्या त्या क्षेत्राची परिभाषाही माहीत असणे खूप गरजेचे आहे; अन्यथा अर्थाचे अनर्थ होतात, गैरसमज होतात आणि अपेक्षित मत पोहोचवता येत नाही, असेही पेठे म्हणाले.
म्हणूनच नाटकाला सबटायटल!
शब्दांचा योग्य अर्थ रसिकांपर्यंत पोहोचावा, अर्थाचा अनर्थ होऊ नये आणि अपेक्षित भावार्थ सष्ट व्हावा म्हणूनच मी माझ्या नाटकाला अलीकडे सबटायटल देतो. परिणामी, इतर भाषिकांपर्यंतही नाटक किंवा कलाकृती पोहोचते. त्याशिवाय मीदेखील रसिकांशी संवाद साधताना तिन्ही भाषांचा उपयोग करतो. त्यामुळे माझीही शब्दसंपत्ती वाढत असल्याचे पेठे आपल्या नर्मविनोदी शैलीत म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज