म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील ३६ जिल्हा माथाडी मंडळ संपवून एकच मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाने हालचाली सुरू केल्याने मराठवाडा लेबर युनियनने तीव्र संताप व्यक्त करत, याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभ्यास मंडळ स्थापनेबाबत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाची युनियनने गुरुवारी होळी केली.
क्रांतीचौक येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. कायद्यात कालानुरूप बदल करावे लागतात, त्यास विरोध नाहीच पण, शासनाचा हेतू शुद्ध नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केला. प्रा. एच. एम. देसरडा, देविदास कीर्तीशाही, अली खान, शेख रफीक शेख गफूर, प्रवीण सरकटे, कैलास लोखंडे, भरत गायकवाड, संदल खान, प्रकाश ससाने, सर्जेराव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा मंडळ असूनही अद्यापही २५ टक्के कामगारांनाही संरक्षण दिले जात नाही, अशा स्थितीत एकच मंडळ असेल तर राज्यातील कानाकोपऱ्यात काम करणारा कष्टकरी कामगारांना कसा न्याय मिळेल, अभ्यास मंडळात कामगार तसेच कारखाना प्रतिनिधींना स्थान का दिले नाही, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. मूठभर कारखानदारांच्या दबावापोटी शासन हा निर्णय घेत असून, यामुळे कामगारांना आत्महत्या कराव्या लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, हा कायदा वाचविण्यासाठी आता करो वा मरोचा लढा सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आज मूक मोर्चा
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात येणाऱ्या पालकमंत्र्यांचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्तालयावर शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. शहागंज येथून सकाळी आठ मोर्चा सुरू होईल. शासनाने आडमुठी भूमिका सोडली नाही, तर राज्यव्यापी बंद करावा लागले असा इशारा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी दिला आहे.
राज्यातील ३६ जिल्हा माथाडी मंडळ संपवून एकच मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाने हालचाली सुरू केल्याने मराठवाडा लेबर युनियनने तीव्र संताप व्यक्त करत, याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभ्यास मंडळ स्थापनेबाबत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाची युनियनने गुरुवारी होळी केली.
क्रांतीचौक येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. कायद्यात कालानुरूप बदल करावे लागतात, त्यास विरोध नाहीच पण, शासनाचा हेतू शुद्ध नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी केला. प्रा. एच. एम. देसरडा, देविदास कीर्तीशाही, अली खान, शेख रफीक शेख गफूर, प्रवीण सरकटे, कैलास लोखंडे, भरत गायकवाड, संदल खान, प्रकाश ससाने, सर्जेराव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा मंडळ असूनही अद्यापही २५ टक्के कामगारांनाही संरक्षण दिले जात नाही, अशा स्थितीत एकच मंडळ असेल तर राज्यातील कानाकोपऱ्यात काम करणारा कष्टकरी कामगारांना कसा न्याय मिळेल, अभ्यास मंडळात कामगार तसेच कारखाना प्रतिनिधींना स्थान का दिले नाही, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. मूठभर कारखानदारांच्या दबावापोटी शासन हा निर्णय घेत असून, यामुळे कामगारांना आत्महत्या कराव्या लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, हा कायदा वाचविण्यासाठी आता करो वा मरोचा लढा सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आज मूक मोर्चा
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात येणाऱ्या पालकमंत्र्यांचे माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्तालयावर शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. शहागंज येथून सकाळी आठ मोर्चा सुरू होईल. शासनाने आडमुठी भूमिका सोडली नाही, तर राज्यव्यापी बंद करावा लागले असा इशारा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी दिला आहे.