म. टा. प्रतिनिधी, सातारा
सातारा तांडा येथील दोन तलाव पाइपलाइनद्वारे जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार सुभाष झांबड यांच्या निधीतून १० लाख रुपये देण्यात आले आहेत.
सातारा तांडा येथे दोन तलाव आहेत. एक तलाव लहान असून तो पावसाळ्यात भरल्यानंतर पाणी वाहून जाते. या तलावाचे पाणी पाइपलाइनद्वारे दुसऱ्यात तलावात आणण्यात येणार आहे. या दोन्ही तलावाची क्षमता ५ एमएलडी आहे. तलावाच्या २ फूट खाली खोदून २ मीटर स्लोप करण्यात येणार आहे. त्यासाठी ९०० मि.मी. व्यासाचे १९० मीटर पाइप वापरून पाणी मोठ्या तलावात आणले जाणार आहे. तेथे पाणी साचल्यावर ते सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाइपलाइनद्वारेच आणण्यात येणार आहे. यामुळे गावाला दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळेल. यासंबंधीचे साडेतेरा लाख रुपयांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले असून, त्याला मंजुरी मिळाल्यावर त्या कामालाही सुरूवात करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठ्याचे उपअभियंता आय. बी. ख्वाजा यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सायली जमादार, माजी सरपंच फिरोज पटेल, यशवंत कदम, राजू नरवडे, सोमिनाथ शिराणे, रोहन पवार, पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल, वार्ड अधिकारी शैला डाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
सातारा तांडा येथील दोन तलाव पाइपलाइनद्वारे जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार सुभाष झांबड यांच्या निधीतून १० लाख रुपये देण्यात आले आहेत.
सातारा तांडा येथे दोन तलाव आहेत. एक तलाव लहान असून तो पावसाळ्यात भरल्यानंतर पाणी वाहून जाते. या तलावाचे पाणी पाइपलाइनद्वारे दुसऱ्यात तलावात आणण्यात येणार आहे. या दोन्ही तलावाची क्षमता ५ एमएलडी आहे. तलावाच्या २ फूट खाली खोदून २ मीटर स्लोप करण्यात येणार आहे. त्यासाठी ९०० मि.मी. व्यासाचे १९० मीटर पाइप वापरून पाणी मोठ्या तलावात आणले जाणार आहे. तेथे पाणी साचल्यावर ते सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाइपलाइनद्वारेच आणण्यात येणार आहे. यामुळे गावाला दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळेल. यासंबंधीचे साडेतेरा लाख रुपयांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले असून, त्याला मंजुरी मिळाल्यावर त्या कामालाही सुरूवात करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठ्याचे उपअभियंता आय. बी. ख्वाजा यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सायली जमादार, माजी सरपंच फिरोज पटेल, यशवंत कदम, राजू नरवडे, सोमिनाथ शिराणे, रोहन पवार, पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल, वार्ड अधिकारी शैला डाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.