अ‍ॅपशहर

चोरून लग्न तुम्ही करता आणि संसार बापाला चालवायला सांगता?; दानवेंची फटकेबाजी

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार तोफ डागली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2020, 10:18 am
सुरेश कुलकर्णी । जालना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raosaheb Danve


'तुम्ही चोरून लग्न लावलं अन् बापानं संसार चालवावा अशी कशी अपेक्षा करता?,' अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारकडे मदत मागणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

वाचा: खडसेंचा भाजपला रामराम; शुक्रवारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

ते जालन्यात बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी अशाच परिस्थितीत दौरा केला. तेव्हा पंचनामे बाजूला ठेवून मदतीची मागणी केली होती, तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. ठाकरे हे विसरले नसावेत. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस झाला. अतिवृष्टी झाली. मग एका एका शेतकऱ्याचे पंचनामे करत बसायला कुठे वेळ घालवता. सरसकट पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा, अशी मागणी दानवे यांनी केली.

वाचा: ...तर मुख्यमंत्र्यांनी घरातच बसावे; प्रवीण दरेकरांची बोचरी टीका

तुम्ही सतत केंद्राडे बोट दाखवता. तुम्ही चोरून लग्न केलं, आता बापाला संसार चालवायला सांगता? मग कशाला चोरून लग्न केलं? असे दानवे म्हणाले. तरी केंद्र सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही केंद्र सरकारला कळवा, केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज