म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युतीमध्ये जे मतदारसंघ भाजप लढवत नाही, तेथे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवले आहे. त्यादृष्टीने आतापासून ‘होमवर्क’ सुरू केले जाणार असल्याचे वृत्त आहे.
लोकसभेच्या २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविले. २०१९मध्ये त्यापैक्षाही जास्त यश मिळविण्यासाठी ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठेवले आहे. त्यासाठी आतापासून व्यूहरचना आखली जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत भाजपचे केंद्रीय निरीक्षक राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे निरीक्षक प्रामुख्याने प्रमुख पदाधिकारी, लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतिनिधी, संघ परिवारातील प्रमुख व्यक्ती यांच्याशी चर्चा करून अंदाज घेणार आहेत. या निरीक्षकांचे टार्गेट सध्या भाजप लढत नसलेले लोकसभा मतदारसंघ अाहे. महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेबरोबर युती आहे. तीन दशकांपासून असलेल्या युतीमुळे राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये वाटण्या झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांत भाजपने कधीच उमेदवार उभा केले नव्हते. भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार उभा केला नाही. तुलनेने त्या-त्या पक्षांची ताकद देखील त्या लोकसभा मतदारसंघात कमीच आहे.
ताकद कमी असलेल्या व शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवून भाजपचा उमेदवार कसा निवडून आणता येईल, याबद्दल भाजपने निरीक्षकांच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्रीय निरीक्षक अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना सादर करणार आहेत. त्यानंतर आवश्यक ती यंत्रणा उभारली जाणार आहे.
औरंगाबादसाठी महेंद्रसिंह निरीक्षक
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपची स्थिती, संभाव्य उमेदवार आदी बाबींची चाचपणी करण्यासाठी भाजपचे उत्तरप्रदेश येथील खासदार महेंद्रसिंह पाच सप्टेबर रोजी औरंगाबादेत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीचे निरोप शुक्रवारी काही पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आले आहेत.
दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युतीमध्ये जे मतदारसंघ भाजप लढवत नाही, तेथे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवले आहे. त्यादृष्टीने आतापासून ‘होमवर्क’ सुरू केले जाणार असल्याचे वृत्त आहे.
लोकसभेच्या २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविले. २०१९मध्ये त्यापैक्षाही जास्त यश मिळविण्यासाठी ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठेवले आहे. त्यासाठी आतापासून व्यूहरचना आखली जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत भाजपचे केंद्रीय निरीक्षक राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे निरीक्षक प्रामुख्याने प्रमुख पदाधिकारी, लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतिनिधी, संघ परिवारातील प्रमुख व्यक्ती यांच्याशी चर्चा करून अंदाज घेणार आहेत. या निरीक्षकांचे टार्गेट सध्या भाजप लढत नसलेले लोकसभा मतदारसंघ अाहे. महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेबरोबर युती आहे. तीन दशकांपासून असलेल्या युतीमुळे राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये वाटण्या झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांत भाजपने कधीच उमेदवार उभा केले नव्हते. भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार उभा केला नाही. तुलनेने त्या-त्या पक्षांची ताकद देखील त्या लोकसभा मतदारसंघात कमीच आहे.
ताकद कमी असलेल्या व शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवून भाजपचा उमेदवार कसा निवडून आणता येईल, याबद्दल भाजपने निरीक्षकांच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्रीय निरीक्षक अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना सादर करणार आहेत. त्यानंतर आवश्यक ती यंत्रणा उभारली जाणार आहे.
औरंगाबादसाठी महेंद्रसिंह निरीक्षक
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपची स्थिती, संभाव्य उमेदवार आदी बाबींची चाचपणी करण्यासाठी भाजपचे उत्तरप्रदेश येथील खासदार महेंद्रसिंह पाच सप्टेबर रोजी औरंगाबादेत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीचे निरोप शुक्रवारी काही पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आले आहेत.