अ‍ॅपशहर

सासरवाडीत मेव्हण्यासोबत दारू पार्टी करुन घरी जाताना घडलं भयंकर, सकाळी रस्त्यावर होता...

रवींद्र यांनी मेव्हण्यासोबत सोबत दारू दारू पिऊन जेवण केले. त्यांनतर जेवण झाल्यावर मी माझ्या घरी जातो म्हणून सांगून रवींद्र तेथून निघाले, मात्र ते त्यांच्या घरी पोहोचलेच नाही.

Maharashtra Times 25 Feb 2022, 9:48 pm
औरंगाबाद : आपल्या सासुरवाडीतून जेवण झाल्यावर घरी जातो म्हणून सांगून निघालेल्या जावयाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना शहरातील झेंडा चौक येथे घडली आहे. रविंद्र किशोर मगरे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मगरे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aurangabad crime


याबाबत मयताच्या भावाने पोलिसात दिलेल्या फार्यादीत म्हटले आहे की, मयत रवींद्र मगरे पत्नीसोबत गुरुवारी आपली सासुरवाडी राजनगर येथे गेले होते. त्यांनतर रात्री रवींद्र यांनी मेव्हण्यासोबत सोबत दारू दारू पिऊन जेवण केले. त्यांनतर जेवण झाल्यावर मी माझ्या घरी जातो म्हणून सांगून रवींद्र तेथून निघाले, मात्र ते त्यांच्या घरी पोहोचलेच नाही.

भरधाव ट्रकची कारला भीषण धडक, अपघातात वडिलांसह २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, एक जखमी
तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मेहुणा कामावर जात असताना झेंडा चौक येथे सिमेंटच्या रस्त्यावर रवींद्र मगरे हे मृत अवस्थेत दिसून आले. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला होता, त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव चालू होता. त्याच अवस्थेत मुकुंदवाडी पोलिसांनी रवींद्र यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, घाटीतील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे याप्रकरणी मयत रवींद्र मगरे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पाटील ट्रान्सपोर्टची बस आणि त्याचा चालक गणेश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी राठोड याला ताब्यात घेतले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज