म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कोपर्डी (जि. नगर) घटनेनंतर निघणाऱ्या मोर्चातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. मुली, महिला अन्याय, अत्याचाराविरोधात रस्त्यावर येत आहेत. समाज जागृत झाला आहे. सहनशीलतेच्या पलिकडे गेल्याशिवाय समाजाची अशी प्रतिक्रिया येत नाही. अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची होणारी मागणी लक्षात घेऊन सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारणमीमांसा तपासून आवश्यक त्या ठिकाण दुरुस्ती केली पाहिजे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
पवार दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. दौरा आटोपून जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेती, औरंगाबाद व उस्मानाबादेत निघालेल्या मोर्चासंदर्भात विचारले असता ते म्हणाले,‘एखाद्या घटनेचा निषेध करणे स्वाभाविक आहे. अत्याचाराच्या घटना सहन करण्याची क्षमता संपली की त्याचा निषेध मोर्चातून व्यक्त होतो. मोर्चाच्या निमित्ताने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी समोर येत आहे. या संदर्भात सरकारने काही सुधारणा करता येतील काय हे तपासले पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठा आरक्षणाची जुनी मागणी आहे. यासह मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.’
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत
गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ होता. यंदा सुरवातीला चांगला पाऊस झाला, पण आता गॅप पडला आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत. गॅप राहिलाच तर आणखी एक वाईट वर्ष मराठवाड्याच्या वाट्याला येईल, पण अशी परिस्थिती येणार नाही अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘कोपर्डी (जि. नगर) घटनेनंतर निघणाऱ्या मोर्चातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. मुली, महिला अन्याय, अत्याचाराविरोधात रस्त्यावर येत आहेत. समाज जागृत झाला आहे. सहनशीलतेच्या पलिकडे गेल्याशिवाय समाजाची अशी प्रतिक्रिया येत नाही. अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची होणारी मागणी लक्षात घेऊन सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारणमीमांसा तपासून आवश्यक त्या ठिकाण दुरुस्ती केली पाहिजे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
पवार दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. दौरा आटोपून जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेती, औरंगाबाद व उस्मानाबादेत निघालेल्या मोर्चासंदर्भात विचारले असता ते म्हणाले,‘एखाद्या घटनेचा निषेध करणे स्वाभाविक आहे. अत्याचाराच्या घटना सहन करण्याची क्षमता संपली की त्याचा निषेध मोर्चातून व्यक्त होतो. मोर्चाच्या निमित्ताने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी समोर येत आहे. या संदर्भात सरकारने काही सुधारणा करता येतील काय हे तपासले पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठा आरक्षणाची जुनी मागणी आहे. यासह मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.’
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत
गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ होता. यंदा सुरवातीला चांगला पाऊस झाला, पण आता गॅप पडला आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत. गॅप राहिलाच तर आणखी एक वाईट वर्ष मराठवाड्याच्या वाट्याला येईल, पण अशी परिस्थिती येणार नाही अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.