अ‍ॅपशहर

Weather Update : औरंगाबादसह मराठवाड्यात ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अनेक भागात कांदा काढणीसाठी आला आहे तर, काही ठिकाणी कांदा शेतात काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2021, 12:07 pm
औरंगाबाद : पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर औरंगाबादसह मराठवाड्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शेतातील पिकं काढण्यासाठी बळीराजा धावपळ करत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain weather monsoon news


राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सकाळपासून औरंगाबादसह मराठवाड्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागात पाऊस सुद्धा पडत असल्याचर पाहायला मिळत आहे.

Weather Alert : मुंबई, पुण्यात पावसाला सुरुवात; राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस वेचणी सुरू असतानाच जर पाऊस पडला तर कापसाचे बोंड ओली होऊन खराब होऊ शकतात. तसेच अनेक भागात कांदा काढणीसाठी आला आहे तर, काही ठिकाणी कांदा शेतात काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज