औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषणावर आम्ही काहीच बोलणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात त्यांना जाहीर सभेतून उत्तर देतील, असं शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. औरंगाबाद नामांतरावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यावर खैरे यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारनं औरंगाबादचं नामांतर होऊ दिलं नाही, असा दावाही त्यांनी केला. औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार, असा प्रश्न चंद्रकांत खैरेंना विचारण्यात आला. त्यावर अहमदाबादचं कर्णावतीनगर झालं का? हैदराबादचं भाग्यनगर झालं का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आम्ही त्या त्या राज्यांत जाऊन नामांतर केलं. औरंगाबादचं संभाजीनगर केंद्रानं होऊ दिलं नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सरप्राईज देतील, असं खैरे म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. ८ जूनला औरंगाबादमध्ये त्यांची जाहीर सभा होईल. त्या सभेतून मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांना उत्तर देतील, असं खैरेंनी म्हटलं. उद्या औरंगाबादमध्ये पाणी टंचाईमध्ये भाजपनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यावरही खैरेंनी टीका केली. भाजपच्या मोर्चाला महिला कुठून येणार, त्यांना कोण आणणार, असे प्रश्न खैरेंनी उपस्थित केले. भाजपकडे मोठी आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे ते पैसे देऊन माणसं जमवू शकतात, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. ८ जूनला औरंगाबादमध्ये त्यांची जाहीर सभा होईल. त्या सभेतून मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांना उत्तर देतील, असं खैरेंनी म्हटलं. उद्या औरंगाबादमध्ये पाणी टंचाईमध्ये भाजपनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यावरही खैरेंनी टीका केली. भाजपच्या मोर्चाला महिला कुठून येणार, त्यांना कोण आणणार, असे प्रश्न खैरेंनी उपस्थित केले. भाजपकडे मोठी आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे ते पैसे देऊन माणसं जमवू शकतात, असा टोला त्यांनी लगावला.