म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हर्टिकल गार्डनची संकल्पना औरंगाबाद शहरात राबवली जाणार आहे. उड्डाणपुलाच्या भिंती, नाले-नदीवरच्या पुलांच्या भिंतींवर उद्याने विकसित करण्याची योजना काही महिन्यात प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
प्रदुषणाच्या दृष्टीने औरंगाबाद शहर 'रेड झोन'मध्ये आहे. वायू प्रदूषण वाढल्यामुळे औरंगाबाद धोक्याच्या पातळीवर आहे. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला जातो, परंतु दोन वर्षात हा अहवाल प्रसिध्द झाला नाही. त्यामुळे पर्यावरण व प्रदुषणाच्या पातळीवर औरंगाबाद नक्की कसे आहे, याबद्दल स्पष्टता झालेली नाही. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांच्या मतानुसार औरंगाबाद शहर 'रेड झोन'मध्ये आहे. शहर वायू प्रदुषणातून बाहेर पडावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून काही ठिकाणी ऑक्सिजन हब तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यात प्रामुख्याने सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट पर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. त्याशिवाय जालाननगर, पारिजातनगर, हर्सुल तलावाचा परिसर या ठिकाणच्या ऑक्सिजन हबचा समावेश आहे. काही वॉर्डांमध्ये देखील दोन-पाच एकर क्षेत्रावर ऑक्सिजन हब तयार करण्यात आले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानांपैकी काही उद्यानांच्या विकासाचे, देखभाल दुरुस्तीचे काम देखील महापालिकेने हाती घेतले आहे, त्यामुळे वायू प्रदुषण कमी होईल, असे मानले जात आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले, शासनाकडून महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळणार आहे. या निधीतून व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. भिंतींवर विशिष्ट प्रकारच्या कुंड्या लाऊन त्यात झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी उड्डाणपुलांच्या भिंतीचा, नदी-नाल्यावरील पुलांच्या भिंतींवर उद्यान साकारले जाईल. भिंतीवरील उद्यानांमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, वायू प्रदूषण कमी होईल, असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला. प्रदुषण कमी झाल्यावर उद्योगांना चालना मिळेल, नवनवीन उद्योग औरंगाबादमध्ये येतील असे पांडेय म्हणाले. व्हर्टिकल गार्डनसाठीचे नियोजन लवकरच केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
-
पर्यावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हर्टिकल गार्डनची संकल्पना औरंगाबाद शहरात राबवली जाणार आहे. उड्डाणपुलाच्या भिंती, नाले-नदीवरच्या पुलांच्या भिंतींवर उद्याने विकसित करण्याची योजना काही महिन्यात प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
प्रदुषणाच्या दृष्टीने औरंगाबाद शहर 'रेड झोन'मध्ये आहे. वायू प्रदूषण वाढल्यामुळे औरंगाबाद धोक्याच्या पातळीवर आहे. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला जातो, परंतु दोन वर्षात हा अहवाल प्रसिध्द झाला नाही. त्यामुळे पर्यावरण व प्रदुषणाच्या पातळीवर औरंगाबाद नक्की कसे आहे, याबद्दल स्पष्टता झालेली नाही. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांच्या मतानुसार औरंगाबाद शहर 'रेड झोन'मध्ये आहे. शहर वायू प्रदुषणातून बाहेर पडावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून काही ठिकाणी ऑक्सिजन हब तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यात प्रामुख्याने सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट पर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. त्याशिवाय जालाननगर, पारिजातनगर, हर्सुल तलावाचा परिसर या ठिकाणच्या ऑक्सिजन हबचा समावेश आहे. काही वॉर्डांमध्ये देखील दोन-पाच एकर क्षेत्रावर ऑक्सिजन हब तयार करण्यात आले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानांपैकी काही उद्यानांच्या विकासाचे, देखभाल दुरुस्तीचे काम देखील महापालिकेने हाती घेतले आहे, त्यामुळे वायू प्रदुषण कमी होईल, असे मानले जात आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले, शासनाकडून महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळणार आहे. या निधीतून व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. भिंतींवर विशिष्ट प्रकारच्या कुंड्या लाऊन त्यात झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी उड्डाणपुलांच्या भिंतीचा, नदी-नाल्यावरील पुलांच्या भिंतींवर उद्यान साकारले जाईल. भिंतीवरील उद्यानांमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, वायू प्रदूषण कमी होईल, असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला. प्रदुषण कमी झाल्यावर उद्योगांना चालना मिळेल, नवनवीन उद्योग औरंगाबादमध्ये येतील असे पांडेय म्हणाले. व्हर्टिकल गार्डनसाठीचे नियोजन लवकरच केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
-