अ‍ॅपशहर

काँग्रेस पक्षाकडून निवडणूक तयारी सुरू

विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार महागाई, इंधन दरवाढ, बुलेट ट्रेन, शेतकरी कर्जमाफीसह अनेक मुद्यांवरून अडचणीत आले आहे. सत्तेत सहभागी शिवसेनेचा विरोध, जनतेतून मिळणाऱ्या सूचनांमुळे तीन वर्षांपूर्वी सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास पुन्हा बळकट होऊ लागला आहे. पक्षाने विविध पातळ्यांवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून औरंगाबादमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दौरा असल्याचे मानले जात आहे.

मकरंद कुलकर्णी | Maharashtra Times 4 Oct 2017, 3:00 am
औरंगाबादः विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार महागाई, इंधन दरवाढ, बुलेट ट्रेन, शेतकरी कर्जमाफीसह अनेक मुद्यांवरून अडचणीत आले आहे. सत्तेत सहभागी शिवसेनेचा विरोध, जनतेतून मिळणाऱ्या सूचनांमुळे तीन वर्षांपूर्वी सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास पुन्हा बळकट होऊ लागला आहे. पक्षाने विविध पातळ्यांवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून औरंगाबादमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दौरा असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress election
काँग्रेस पक्षाकडून निवडणूक तयारी सुरू

काँग्रेसची केंद्रातील २०१४ मध्ये सत्ता गेली. सहा महिन्यानंतर राज्यातील सत्तेपासूनही काँग्रेसला दूर व्हावे लागले. त्यानंतर झालेल्या महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही पीछेहाट झाली. शिवसेनेला हाताशी धरून काही ठिकाणी सत्ता मिळविली पण भाजपची विजयी मालिका खंडित करण्यात अपयश आले. सततच्या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला होता. या दरम्यान राज्यातील काही नेते काँग्रेस सोडून गेल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. एवढी अडचण होऊनही पक्षांतर्गत कलह, गटतटांमुळे विशिष्ट मंडळींनाच पदांचे वाटप काँग्रेसमध्ये सुरूच होते. गेल्या दोन, तीन महिन्यांपासून विविध मुद्यांवरून केंद्र व राज्य सरकार अडचणीत आले आहे. शेतकरी कर्जमाफीचा अंतिम निर्णय अजून व्हायचा आहे, बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. सोशल मिडिया आणि जाहीररित्या नागरिक सरकारविरोधी भूमिका मांडत आहेत. भाजपविरुद्ध वाढत असलेला रोष पाहून काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा जनतेत जाण्याची तयारी सुरू केली आहे.
नांदेड महापालिकेच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातील काँग्रेसनेते नांदेडमध्ये जाणार आहेत. पक्षबांधणीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी औरंगाबादेत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात औरंगाबादसह मराठवाड्यात काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते येऊन मार्गदर्शन करणार आहेत. एक प्रकारे काँग्रेसने निवडणुकीची तयारीच सुरू केल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसचा शिपाई कायम निवडणुकीला तयार असतो. देशात आणि राज्यातील सरकारने जी बनवाबनवी चालविली आहे. ती आता जनतेच्या लक्षात आली आहे. लोक पुन्हा काँग्रेसच्या पाठिशी उभे राहतील.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज