नांदेडमधील सभेत खासदार राहुल गांधी यांचे प्रतिपादन
नांदेड : महाराष्ट्राच्या डीएनएमध्येच काँग्रेस आहे. आगामी सरकार एका व्यक्तीचे नव्हे तर, सर्व भारतीयांचे असेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाण, हिंगोलीचे सुभाष वानखेडे व लातूरचे मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
नवा मोंढा मैदानावर झालेल्या या सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुरेश वडेट्टीवार, राजेंद्र दर्डा, हर्षवर्धन पाटील, बसवराज पाटील, मुकूल वासनिक, मधुसूदन मिस्त्री, आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर व्यासपीठावर होते. गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करण्यात आली. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा करण्यात आली परंतु, या सरकारने जनतेला उल्लू बनविले. नोटबंदी, गब्बरसिंग टॅक्सने भारताची अर्थव्यवस्था ठप्प झाली.
काँग्रेसची सत्ता आली तर, तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन वर्षे कोणत्याही शासकीय खात्याची परवानगी घ्यावी लागणार नाही. न्याय योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाईल. २२ लाख शासकीय रिक्त पदांची भरती त्वरित केली जाईल. एक वर्षांत २२ लाख नोकऱ्या देऊ, शिवाय अनुसूचित जाती जमातीच्या दहा लाख तरुणांचा अनुशेष भरून काढला जाईल. सर्व चौकीदार चांगले आहेत, पण एक बेईमान निघाला. अंबानीसारख्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करताना शेतकऱ्यांची मात्र उपेक्षा केली जाते. काँग्रेसचे सरकार आले तर, कर्ज न फेडणाऱ्या एकाही शेतकऱ्याला कारागृहात जाण्याची वेळ येणार नाही. अंबानींची तिजोरी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी खुली करू असे आश्वासन राहुल यांनी दिले.
चव्हाण म्हणाले की, मराठवाड्याची उपेक्षा सुरू आहे. नांदेडकरांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्यांचे ऋण मी विसरणार नाही. मला राजकीयदृष्टया संपविण्याचा डाव सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारचा कारभार म्हणजे चुनावी जुमले आहेत. वंचित आघाडी ही भाजपची 'बी टीम' आहे. त्यामुळे कोणत्याही भुलथापांना बळी न पडता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे. काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर यांनी आभार मानले.
नांदेड : महाराष्ट्राच्या डीएनएमध्येच काँग्रेस आहे. आगामी सरकार एका व्यक्तीचे नव्हे तर, सर्व भारतीयांचे असेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाण, हिंगोलीचे सुभाष वानखेडे व लातूरचे मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
नवा मोंढा मैदानावर झालेल्या या सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुरेश वडेट्टीवार, राजेंद्र दर्डा, हर्षवर्धन पाटील, बसवराज पाटील, मुकूल वासनिक, मधुसूदन मिस्त्री, आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर व्यासपीठावर होते. गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करण्यात आली. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा करण्यात आली परंतु, या सरकारने जनतेला उल्लू बनविले. नोटबंदी, गब्बरसिंग टॅक्सने भारताची अर्थव्यवस्था ठप्प झाली.
काँग्रेसची सत्ता आली तर, तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन वर्षे कोणत्याही शासकीय खात्याची परवानगी घ्यावी लागणार नाही. न्याय योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाईल. २२ लाख शासकीय रिक्त पदांची भरती त्वरित केली जाईल. एक वर्षांत २२ लाख नोकऱ्या देऊ, शिवाय अनुसूचित जाती जमातीच्या दहा लाख तरुणांचा अनुशेष भरून काढला जाईल. सर्व चौकीदार चांगले आहेत, पण एक बेईमान निघाला. अंबानीसारख्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करताना शेतकऱ्यांची मात्र उपेक्षा केली जाते. काँग्रेसचे सरकार आले तर, कर्ज न फेडणाऱ्या एकाही शेतकऱ्याला कारागृहात जाण्याची वेळ येणार नाही. अंबानींची तिजोरी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी खुली करू असे आश्वासन राहुल यांनी दिले.
चव्हाण म्हणाले की, मराठवाड्याची उपेक्षा सुरू आहे. नांदेडकरांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्यांचे ऋण मी विसरणार नाही. मला राजकीयदृष्टया संपविण्याचा डाव सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारचा कारभार म्हणजे चुनावी जुमले आहेत. वंचित आघाडी ही भाजपची 'बी टीम' आहे. त्यामुळे कोणत्याही भुलथापांना बळी न पडता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे. काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर यांनी आभार मानले.
पंतप्रधान पत्रकार परिषद घेण्यास का घाबरतात? मी त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहे. रेसकोर्सवर त्यांनी मला १५ मिनिटे द्यावीत. मी त्यांना राफेल, भ्रष्टाचार तसेच अमित शहांच्या पुत्राच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याबाबत विचारेन.