नांदेडः महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असा गौप्यस्फोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर राज्यात भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. अशोक चव्हाण यांना या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी तीन पक्षाच्या सरकार बनवण्या संबंधीचा गौप्यस्फोट केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी) सरकार सत्तेत आहे. सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरू आहेत. नांदेडमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापण करण्याविषयीचा गौप्यस्फोट केला. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
राजकारण असो की चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन ही सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला काँग्रेसचा विरोध
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार
'शिवभोजन'ला प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री
महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर राज्यात भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. अशोक चव्हाण यांना या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी तीन पक्षाच्या सरकार बनवण्या संबंधीचा गौप्यस्फोट केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी) सरकार सत्तेत आहे. सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरू आहेत. नांदेडमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापण करण्याविषयीचा गौप्यस्फोट केला. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
राजकारण असो की चित्रपट, नाट्य क्षेत्र असो हे तीन ही सारखेच आहेत. आमचे तीन पक्ष एकत्र येतील असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे, या प्रश्नावर आम्ही म्हणतो, घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला काँग्रेसचा विरोध
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार
'शिवभोजन'ला प्रतिसाद; ११,२७४ थाळींची विक्री