म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे हँग झालेले नेते आहेत. त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते आणि ते केव्हापर्यंत सोबत राहतील याची आम्हाला कल्पना आहे. माझा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास राहिला नसल्याचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (१५ एप्रिल) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 'भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात आहे. मी भाजपच्या संपर्कात नाही,' असेही त्यांनी स्पष्ट दिले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील उपस्थित होते. 'पक्षाच्या वरिष्ठांकडे स्थानिक, मजबूत उमेदवार देण्याची आपण मागणी केली होती, मात्र पक्षाने ती ऐकली नाही. पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी मी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे मी अर्ज मागे घेतला. पक्षाने आधीच मला उमेदवारी दिली असती तर बंडखोरी करण्याचा प्रसंगच आला नसता,' असे सांगून अब्दुल सत्तारांनी पक्षश्रेष्ठींवर तोफा डागली.
मुख्यमंत्री, भाजपच्या अन्य नेत्यांच्या भेटीबाबत सत्तार म्हणाले,'भाजपमध्ये जायचे असते तर, चार वर्षांपूर्वीच गेलो असतो, मात्र तशी वेळ आलेली नाही आणि पुढे येणार ही नाही.'
'टोपी आणखी पाच वर्षे राहणार'
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत पराभव केल्याशिवाय आपण डोक्यावरील टोपी काढणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञेबाबत विचारले असता 'आणखी पाच वर्षे टोपी कायम ठेवावी लागेल,'असे सूचक उत्तर सत्तार यांनी दिले. जालना लोकसभा मतदारसंघाबाबत सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे हँग झालेले नेते आहेत. त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते आणि ते केव्हापर्यंत सोबत राहतील याची आम्हाला कल्पना आहे. माझा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास राहिला नसल्याचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (१५ एप्रिल) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 'भारतीय जनता पक्ष माझ्या संपर्कात आहे. मी भाजपच्या संपर्कात नाही,' असेही त्यांनी स्पष्ट दिले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील उपस्थित होते. 'पक्षाच्या वरिष्ठांकडे स्थानिक, मजबूत उमेदवार देण्याची आपण मागणी केली होती, मात्र पक्षाने ती ऐकली नाही. पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी मी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे मी अर्ज मागे घेतला. पक्षाने आधीच मला उमेदवारी दिली असती तर बंडखोरी करण्याचा प्रसंगच आला नसता,' असे सांगून अब्दुल सत्तारांनी पक्षश्रेष्ठींवर तोफा डागली.
मुख्यमंत्री, भाजपच्या अन्य नेत्यांच्या भेटीबाबत सत्तार म्हणाले,'भाजपमध्ये जायचे असते तर, चार वर्षांपूर्वीच गेलो असतो, मात्र तशी वेळ आलेली नाही आणि पुढे येणार ही नाही.'
'टोपी आणखी पाच वर्षे राहणार'
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत पराभव केल्याशिवाय आपण डोक्यावरील टोपी काढणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञेबाबत विचारले असता 'आणखी पाच वर्षे टोपी कायम ठेवावी लागेल,'असे सूचक उत्तर सत्तार यांनी दिले. जालना लोकसभा मतदारसंघाबाबत सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.