अ‍ॅपशहर

बोंडअळी नियंत्रणात; कृषी आयुक्तांचा दावा

म टा प्रतिनिधी, औरंगाबादबोंडअळी नियंत्रणात आहे, असा दावा राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे...

Maharashtra Times 17 Aug 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोंडअळी नियंत्रणात आहे, असा दावा राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना आखत तशी अंमलबजाणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

गत हंगामात कापसावर बोंडअळीचा झालेल्या प्रादुर्भावमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही बोंडअळीने डोके वर काढले आहे. यापार्श्वभूमीवर कृषी आयुक्त सिंह यांनी गुरुवारी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचे नमूद केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानूसार सर्वस्तरावर काम सुरु असून आर्थिक नुकसानीच्या वर प्रादुर्भाव आढळून येतातच तातडीने किटकनाशक फवारणी केली जाते. यासह गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या जनजागृती अभियानामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याचा दावा त्यांना केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज