औरंगाबाद : महापालिका प्रशासन दलित वस्तीविरोधी भूमिका घेऊन विकास कामे करत नसल्याचा आरोप नगरसेवक राहुल सोनवणे यांनी केला आहे. पालिकेने २५ जानेवारीपर्यंत वॉर्डातील कामे सुरू न केल्यास प्रजासत्तादिनी अत्मदहन करू, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कबीरनगर वार्डातील समस्या आयुक्तांना वारंवार सांगूनही सुटल्या नाहीत. मागील तीन वर्षांपासून वार्डात दूषित पाण्याची समस्या आहे. नाला दुरुस्तीचे काम होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे.
नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा
महापालिका प्रशासन दलित वस्तीविरोधी भूमिका घेऊन विकास कामे करत नसल्याचा आरोप नगरसेवक राहुल सोनवणे यांनी केला आहे...
30 20 Jan 2019, 4:00 am