म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागेल का, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरात दिवसभर गर्दी दिसून आली. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाज्यांच्या खरेदीसाठी रविवारी झुंबड उडाली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सकाळपासून फळे, भाजीपाला खरेदीसाठी नागिरकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. नऊ, दहाच्या सुमारास बाजारपेठेत पाय ठेवायला ही जागा नव्हती. करोना पार्श्वभूमीवर, सुरक्षित वावर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम या गर्दीमध्ये पायदळी तुडवले गेल्याचे दिसत होते. नेहमीपेक्षा वीस ते तीस टक्के जास्त गर्दी होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. करोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यात लॉकडाऊन लागेल अशा प्रकारची शनिवारी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरून त्याची माहिती फिरू लागल्याने त्याचा परिणाम रविवारी गर्दी वाढण्यात झाल्याचे सांगण्यात येते. मिळेल त्या भावात खरेदीचा कल ग्राहकांचा होता. गर्दी वाढल्याने विक्रेत्यांनी फळांचे, भाजीपाल्याचे भाव ही वाढविले. अशीच गर्दी शहरातील इतर बाजारपेठांमध्येही दिवसभर होती.
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागेल का, या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरात दिवसभर गर्दी दिसून आली. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाज्यांच्या खरेदीसाठी रविवारी झुंबड उडाली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सकाळपासून फळे, भाजीपाला खरेदीसाठी नागिरकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. नऊ, दहाच्या सुमारास बाजारपेठेत पाय ठेवायला ही जागा नव्हती. करोना पार्श्वभूमीवर, सुरक्षित वावर, मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम या गर्दीमध्ये पायदळी तुडवले गेल्याचे दिसत होते. नेहमीपेक्षा वीस ते तीस टक्के जास्त गर्दी होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. करोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यात लॉकडाऊन लागेल अशा प्रकारची शनिवारी चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरून त्याची माहिती फिरू लागल्याने त्याचा परिणाम रविवारी गर्दी वाढण्यात झाल्याचे सांगण्यात येते. मिळेल त्या भावात खरेदीचा कल ग्राहकांचा होता. गर्दी वाढल्याने विक्रेत्यांनी फळांचे, भाजीपाल्याचे भाव ही वाढविले. अशीच गर्दी शहरातील इतर बाजारपेठांमध्येही दिवसभर होती.