म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काचीगुडा-मनमाड पॅसेंजर उशिराने धावत असल्यामुळे मनमाडकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या पुढील कामाच्या वेळा चुकत आहेत. त्यामुळे ही रेल्वे वेळेवर सोडावी या मागणीसाठी रेल्वे संघटना आंदोलनच्या पावित्र्यात आहे. रेल्वे प्रवाशांनी मंगळवारी स्टेशनच्या जुना इमारतीत मंगळवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.
काचीगुडा-मनमाड पॅसेंजरची काही दिवसांपासून दीड ते दोन तास उशिरा येत आहे. त्यामुळे औरंगाबाद ते मनमाड दरम्यानच्या स्टेशनवर दररोज अप-डाउन करणारे प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पुढील सर्व वेळा चुकत आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांनी मंगळवारी एकत्र होऊन रेल्वे वेळेवर सोडण्याची मागणी केली. शुक्रवारपर्यंत रेल्वेची वेळ नियमित न झाल्यास शुक्रवारीच रेल्वे स्टेशनला घेराव टाकण्याचा इशारा देण्यात आला. या बैठकीला राज सोमाणी, संतोष सोमाणी, आसिफ शहा, सलमान पठाण, गणेश कहाळे यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.