अ‍ॅपशहर

बळीराजांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळीचा जिल्ह्यात कहर; उभी रब्बी पिके झाली अडवी

बळीराजानं करावं तरी काय? कधी पिकाला भाव कमी तर कधी अवकाळी पाऊस. रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 7 Mar 2023, 6:51 am
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासह मराठवाड्यात रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारी पहाटे अवकाळीने हजेरी लावली. दरम्यान, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळीने रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aur farm
बळीराजांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळीचा जिल्ह्यात कहर; उभी रब्बी पिके झाली अडवी


मराठवाड्यातील काही भागात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहरासह जिल्ह्यात गडगडाटासह हलक्या सरी झाल्या. काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेने व्यक्त केला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या.

दरम्यान, पावसाचा फळबागांवरही परिणाम झाला असून काही भागात आंब्याचा मोहर गळाला आहे. मोसंबी, डाळिंब फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांची आणि टरबूज, खरबुजाची लवकर काढणी करावी, असे आवाहन केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख