म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ नद्यांच्या माध्यमातून ५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सामंजस्य कराराच्या माध्यमातून योजना केंद्राकडे गेल्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल, असे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानात ध्वजवंदन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडामोडे, आमदार संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, अतुल सावे, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती.
यावेळी, ‘गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने मराठवाड्यात विषेश लक्ष दिले,’ असे त्यांनी सांगितले. विभागातील ४० लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला असून, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धरणांची कामे केली; तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाले आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी विभागात सर्वप्रथम वॉटरग्रीडचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, हा प्रकल्प पिण्याचे पाणी, शेती, उद्योगांसाठी वरदान ठरेल, ‘डीएमआयसी’चे देशातील पहिले काम ऑरिक सिटीच्या माध्यमातून शहरात सुरू झाले, येत्या दोन वर्षांत पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या ऑरिक सिटीच्या माध्यमातून तीन लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार अाहे,’ असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा चेहरा बदलण्यासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पीक विमा योजनेसह सरकारच्या विविध योजनांना मोठा प्रतिसाद मिळालला आहे. देशातील सर्वाधिक विमा प्राप्त केलेल्या जिल्ह्यांपैकी काही जिल्हे मराठवाड्यातील असून, राज्यातही मराठवाड्यातील आठही जिल्हे पुढे आहेत. कर्जमाफीलाही मोठा प्रतिसाद मिळाला असून, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आता विकासाचा संग्राम
मराठवाड्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे युद्ध केले. मोठा त्याग केला आहे, आता आपल्या पिढीला विकासासाठी संग्राम करावयाचा आहे. विकासाच्या या संग्रामामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवादपासून मुक्ती हवी आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणापासून मुक्ती हवी आहे. हा मुक्तीचा संग्राम आपण एकत्रितपणे लढू, या संग्रामामध्येही मराठवाडा निश्चित विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ नद्यांच्या माध्यमातून ५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सामंजस्य कराराच्या माध्यमातून योजना केंद्राकडे गेल्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल, असे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानात ध्वजवंदन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडामोडे, आमदार संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, अतुल सावे, प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती.
यावेळी, ‘गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने मराठवाड्यात विषेश लक्ष दिले,’ असे त्यांनी सांगितले. विभागातील ४० लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला असून, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धरणांची कामे केली; तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाले आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी विभागात सर्वप्रथम वॉटरग्रीडचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, हा प्रकल्प पिण्याचे पाणी, शेती, उद्योगांसाठी वरदान ठरेल, ‘डीएमआयसी’चे देशातील पहिले काम ऑरिक सिटीच्या माध्यमातून शहरात सुरू झाले, येत्या दोन वर्षांत पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या ऑरिक सिटीच्या माध्यमातून तीन लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार अाहे,’ असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा चेहरा बदलण्यासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पीक विमा योजनेसह सरकारच्या विविध योजनांना मोठा प्रतिसाद मिळालला आहे. देशातील सर्वाधिक विमा प्राप्त केलेल्या जिल्ह्यांपैकी काही जिल्हे मराठवाड्यातील असून, राज्यातही मराठवाड्यातील आठही जिल्हे पुढे आहेत. कर्जमाफीलाही मोठा प्रतिसाद मिळाला असून, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आता विकासाचा संग्राम
मराठवाड्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे युद्ध केले. मोठा त्याग केला आहे, आता आपल्या पिढीला विकासासाठी संग्राम करावयाचा आहे. विकासाच्या या संग्रामामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवादपासून मुक्ती हवी आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणापासून मुक्ती हवी आहे. हा मुक्तीचा संग्राम आपण एकत्रितपणे लढू, या संग्रामामध्येही मराठवाडा निश्चित विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.