परभणी : पाथरीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बुधवारपासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. वारंवार बँकेचे खेटे मारून सुद्धा कर्ज भेटत नसल्याने हा शेतकरी वैतागला होता, त्यामुळे संबंधित बँक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला होता.
तुकाराम वैजनाथराव काळे (वय ४२, रा. मरडसगाव ता. पाथरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाथरी येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या विरोधात यापूर्वी भाकपाच्या नेतृत्वात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. परंतु, प्रत्येक वेळी बँक अधिकाऱ्यांनी आश्वासनावर बोळवण केल्याने बुधवारपासून (१२ डिसेंबर) बँकेपुढे शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, या दरम्यान गुरुवारी (१३ डिसेंबर) दुपारी छातीत दुःखत असल्याने काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मानवत येथील शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.
दरम्यान, या घटनेमुळे पाथरी शहरातील बँके समोर शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत. या दुर्घटनेस बँकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाकपचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पाथरीच्या पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत ठिय्या दिला होता. ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याने घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तुकाराम वैजनाथराव काळे (वय ४२, रा. मरडसगाव ता. पाथरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाथरी येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या विरोधात यापूर्वी भाकपाच्या नेतृत्वात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलने केली. परंतु, प्रत्येक वेळी बँक अधिकाऱ्यांनी आश्वासनावर बोळवण केल्याने बुधवारपासून (१२ डिसेंबर) बँकेपुढे शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, या दरम्यान गुरुवारी (१३ डिसेंबर) दुपारी छातीत दुःखत असल्याने काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मानवत येथील शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.
दरम्यान, या घटनेमुळे पाथरी शहरातील बँके समोर शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत. या दुर्घटनेस बँकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाकपचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पाथरीच्या पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत ठिय्या दिला होता. ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याने घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.