म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समृद्धी महामार्गामध्ये बाधित झालेल्या चार गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (एक जानेवारी) जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांची भेट घेऊन दर वाढवून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली.
पळशी, कान्हापूर, महालपिंप्री या गावांतील सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन दरांमध्ये होत असलेली तफावत निदर्शनास आणून दिली. पळशी, कान्हापूर, महालपिंप्री या गावांमध्ये शासनाने समृद्धी महामार्गासाठी प्रति एकर १९ लाख ४० हजार, २० लाख ४० हजार, २२ लाख २० हजार आणि २४ लाख ४० हजार रुपये दर जाहीर केला आहे. शेजारी असलेल्या वरूड येथे ६९ लाख, गंगापूर जहांगीर ८४ लाख असे दर जाहीर केले आहेत.
पळशी, कान्हापूर, कच्चेघाटी, महालपिंप्री ही गावे औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीला लागून असल्यामुळे या गावांमध्ये जमिनीचे अधिक दर आहेत. या गावांना बागायती क्षेत्र गृहित धरून भाव निश्चित करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काही गुंठे वगळता संपूर्ण जमीन प्रकल्पात संपादित झाली असलेल्या शेतकऱ्यांची उर्वरित जमीनही प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी नानासाहेब पळसकर, ज्ञानेश्वर पळसकर, दामोदर शेळके, संजय पळसकर, बाबासाहेब गायकवाड, पांडुरंग पळसकर, बाळासाहेब साळुंके, विलास औताडे, कल्याण चौधरी आदींसह ५० ते ६० शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या जालना दौऱ्यादरम्यान चिकलठाणा विमानतळावर या शेतकऱ्यांनी दोघांची भेट घेतली व मोबदला वाढवून देण्याची मागणी केली.
समृद्धी महामार्गामध्ये बाधित झालेल्या चार गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (एक जानेवारी) जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांची भेट घेऊन दर वाढवून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली.
पळशी, कान्हापूर, महालपिंप्री या गावांतील सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन दरांमध्ये होत असलेली तफावत निदर्शनास आणून दिली. पळशी, कान्हापूर, महालपिंप्री या गावांमध्ये शासनाने समृद्धी महामार्गासाठी प्रति एकर १९ लाख ४० हजार, २० लाख ४० हजार, २२ लाख २० हजार आणि २४ लाख ४० हजार रुपये दर जाहीर केला आहे. शेजारी असलेल्या वरूड येथे ६९ लाख, गंगापूर जहांगीर ८४ लाख असे दर जाहीर केले आहेत.
पळशी, कान्हापूर, कच्चेघाटी, महालपिंप्री ही गावे औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीला लागून असल्यामुळे या गावांमध्ये जमिनीचे अधिक दर आहेत. या गावांना बागायती क्षेत्र गृहित धरून भाव निश्चित करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काही गुंठे वगळता संपूर्ण जमीन प्रकल्पात संपादित झाली असलेल्या शेतकऱ्यांची उर्वरित जमीनही प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी नानासाहेब पळसकर, ज्ञानेश्वर पळसकर, दामोदर शेळके, संजय पळसकर, बाबासाहेब गायकवाड, पांडुरंग पळसकर, बाळासाहेब साळुंके, विलास औताडे, कल्याण चौधरी आदींसह ५० ते ६० शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या जालना दौऱ्यादरम्यान चिकलठाणा विमानतळावर या शेतकऱ्यांनी दोघांची भेट घेतली व मोबदला वाढवून देण्याची मागणी केली.